Advertisements
Advertisements
Question
तुमचे मत नोंदवा.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
Short Answer
Advertisements
Solution
१९४२ मध्ये भारताच्या काही भागांत भूमिगत चळवळ अधिक तीव्र झाली.
- या काळात भारतातील अनेक ठिकाणी समांतर सरकारे स्थापन करण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ‘प्रतिसरकार’ नावाचे पर्यायी सरकार स्थापन केले.
- आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी सातारा परिसरातील ब्रिटिश सत्ता संपुष्टात आणून ‘जनतेचे सरकार’ स्थापन केले.
- या सरकारकडे कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, न्यायनिवाडा करणे आणि गुन्हेगारांना शिक्षा देणे अशी कामे सोपविण्यात आली होती.
अशा प्रकारे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
