Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत नोंदवा.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
- १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनादरम्यान भारतात भूमिगत चळवळ तीव्र झाली आणि अनेक ठिकाणी प्रतिसरकारांची स्थापना झाली. यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यात स्थापन केलेले प्रतिसरकार अत्यंत प्रभावी ठरले.
- या प्रतिसरकारने सातारा जिल्ह्यातून ब्रिटीश शासन पूर्णपणे संपुष्टात आणले आणि प्रत्यक्ष जनतेचे सरकार स्थापन करून समांतर प्रशासन चालवले.
- या सरकारने लोकांच्या हितासाठी कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यासारखी कामे केली.
अशा रितीने भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेले कार्य हे महत्त्वाचे योगदान मानले जाते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
