Advertisements
Advertisements
Question
(संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर) प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते सांगा.
Advertisements
Solution
संत जनाबाई यांच्या मनात श्रीविठ्ठलाचा कायमचा वास वसावा हीच तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्यांनी एक अनोखा उपाय योजला. त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलरूपी चोराला गळ्यात बांधून धरून आणले आणि हृदयाच्या बंदिखान्यात डांबून ठेवले. तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातली आणि त्याच्यावर 'सोहं' शब्दाचा प्रहार केला. इतकेच नव्हे तर त्याला जिवंत न सोडण्याची धमकी दिली. अशा प्रकारे या अभंगातून संत जनाबाईंचा श्रीविठ्ठलाप्रती असणारा अत्यंत उत्कट भाव व्यक्त झाला आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या शब्दासाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.

खाली दिलेल्या शब्दासाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.

जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | ||
| (१) | विठ्ठलाला धरले | (अ) | शब्दरचनेच्या जुळणीने |
| (२) | विठ्ठल काकुलती आला | (आ) | भक्तीच्या दोराने |
| (३) | विठ्ठलाच्या पायी घातली बेडी | (इ) | ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने |
‘सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील विचार स्पष्ट करा.
‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवें न सोडीं मी तुला।।’ या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा.
मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा.
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा.
