Advertisements
Advertisements
Questions
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात तीन युद्ध झाली.
Advertisements
Solution 1
- १७६० पर्यंत म्यानमार (ब्रह्मदेश) एकछत्री अंमलाखाली आणणाऱ्या येथील राज्यकर्त्यांनी मणिपूर जिंकून आसामवर ताबा मिळवला. या घटनेने ब्रिटिश व म्यानमार यांच्यात पहिले युद्ध झाले.
- म्यानमारमधील दोन इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या राज्यकर्त्यांनी दंड ठोठावला. हे निमित्त करून ब्रिटिशांनी म्यानमार वर आक्रमण करून त्याचा काही भाग मिळवला.
- म्यानमारच्या थिबा राजाचे फ्रान्सशी वाढत चाललेले संबंध व ब्रिटिश व्यापारी कंपनीला केलेला दंड या कारणांवरून तिसरे ब्रह्मी युद्ध झाले. या युद्धाने ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या नियंत्रणाखाली आणला.
अशा रितीने ब्रिटिश अमलाखालील प्रदेशाचे संरक्षण करणे व म्यानमारचा प्रदेश मिळवणे या उद्देशाने ब्रिटिश व ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.
Solution 2
- ब्रिटिशांच्या अंमलाखालील प्रदेशास धोका उत्पन्न झाल्यामुळे ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात तीन युद्धे झाली. १८२६ च्या पहिल्या युद्धात ब्रिटिशांनी म्यानमारचा पराभव करून आसाम, मणिपूर ही राज्ये जिंकून घेतली.
- दुसऱ्या युद्धातही त्यांनी म्यानमारचा पराभव केला. याच दरम्यान फ्रान्सने म्यानमारमधील ‘अप्पर बर्मा’ या भागाचा ताबा घेतला.
- तिसऱ्या युद्धात इंग्लंडने मंडाले या भागाचा ताबा घेतला. पुढे ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या वर्चस्वाखाली आणले.
RELATED QUESTIONS
पहिल्या महायुद्धात ______ व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला.
१९३५ मध्ये ______ भारतापासून वेगळा करण्यात आला.
दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली, कारण ______
दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला.
ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वसाहतीकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारी संघटना -
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

खालील विधानावर तुमचे मत नोंदवा.
राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धती अपयशी ठरली.
