Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात तीन युद्ध झाली.
Advertisements
उत्तर
- १७६० पर्यंत Myanmar (ब्रह्मदेश) एकछत्री सत्तेखाली आणणाऱ्या राज्यकर्त्यांनी मणिपूर जिंकून आसामवरही नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात पहिले युद्ध झाले.
- म्यानमारमधील दोन इंग्रज नागरिकांना तेथील राज्यकर्त्यांनी दंड ठोठावला. या कारणाचा आधार घेऊन ब्रिटिशांनी म्यानमारवर आक्रमण केले आणि त्याचा काही प्रदेश ताब्यात घेतला.
- म्यानमारचा राजा थिबा याचे फ्रान्सशी वाढते संबंध आणि ब्रिटिश व्यापारी कंपनीवर लावलेला दंड या कारणांमुळे तिसरे ब्रह्मी युद्ध झाले. या युद्धानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या नियंत्रणाखाली घेतला.
अशा प्रकारे ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे आणि म्यानमारचा प्रदेश मिळवणे या उद्देशाने ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.
संबंधित प्रश्न
पहिल्या महायुद्धात ______ व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला.
१९३५ मध्ये ______ भारतापासून वेगळा करण्यात आला.
दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली, कारण ______
तुमचे मत नोंदवा.
दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला.
ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वसाहतीकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारी संघटना -
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

खालील विधानावर तुमचे मत नोंदवा.
राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धती अपयशी ठरली.
