मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात तीन युद्ध झाली.

स्पष्ट करा
कारण सांगा
Advertisements

उत्तर

  1. १७६० पर्यंत Myanmar (ब्रह्मदेश) एकछत्री सत्तेखाली आणणाऱ्या राज्यकर्त्यांनी मणिपूर जिंकून आसामवरही नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात पहिले युद्ध झाले.
  2. म्यानमारमधील दोन इंग्रज नागरिकांना तेथील राज्यकर्त्यांनी दंड ठोठावला. या कारणाचा आधार घेऊन ब्रिटिशांनी म्यानमारवर आक्रमण केले आणि त्याचा काही प्रदेश ताब्यात घेतला.
  3. म्यानमारचा राजा थिबा याचे फ्रान्सशी वाढते संबंध आणि ब्रिटिश व्यापारी कंपनीवर लावलेला दंड या कारणांमुळे तिसरे ब्रह्मी युद्ध झाले. या युद्धानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या नियंत्रणाखाली घेतला.

अशा प्रकारे ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे आणि म्यानमारचा प्रदेश मिळवणे या उद्देशाने ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.

shaalaa.com
निर्वसाहतीकरण : आशिया
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: जग : निर्वसाहतीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ६९]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 9 जग : निर्वसाहतीकरण
स्वाध्याय | Q ४.१ | पृष्ठ ६९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×