English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: 1. एका शब्दात उत्तर लिहा. (2) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - कवीचा जवळचा मित्र - दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

Advertisements
Advertisements

Question

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

1. एका शब्दात उत्तर लिहा.     (2)

  1. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट -
  2. कवीचा जवळचा मित्र -

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो.
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

2. कृती पूर्ण करा.      (2)

  1. कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
  2. 'दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात', या शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

3. पुढील शब्दांचा अर्थ लिहा.      (2)

  शब्द अर्थ
1. दारिद्र्य ______
2. हरघडी ______
3. साहाय्य ______
4. दुनिया ______

4. 'कवितेत व्यक्‍त झालेले जीवनसत्य', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.  (2)

Comprehension
Advertisements

Solution

1.

  1. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - कवीचे हात
  2. कवीचा जवळचा मित्र - अश्रू

2. 

  1. 'दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो.'
  2. कवीने या काव्यपंक्तीत दारिद्र्याशी संघर्ष करणाऱ्या कष्टकरी कामगाराच्या जीवनातील कठोर वास्तवाचे चित्रण केले आहे. श्रमिक म्हणून त्याला आपल्या हातांनी प्रचंड मेहनत करावी लागते. त्याचे हातच त्याचे सर्वस्व आहेत, पण तीव्र कष्ट करूनही त्याला आयुष्यभर गरिबीचेच जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे, आपले सर्वस्व असलेले हातही दारिद्र्यात अडकून राहिले आहेत, अशी खंत कवीने या पंक्तीतून व्यक्त केली आहे.

3. 

  शब्द अर्थ
1. दारिद्रय गरिबी
2. हरघडी प्रत्येक वेळी
3. साहाय्य मदत
4. दुनिया जग, विश्व

4. कवी नारायण सुर्वे यांच्या “दोन दिवस” या कवितेत विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या जीवनाचे वास्तवात्मक चित्रण केले आहे.
रोजच्या उपजीविकेच्या चिंतेत, दु:ख सहन करत आणि सुखाच्या आशेने वाट पाहत कामगारांचे आयुष्य संपून जाते. चंद्र, तारे, आणि धुंद करणाऱ्या रात्री जरी रोज त्यांच्या जीवनात येत असल्या, तरी त्यांचा आनंद घेण्यासाठी त्यांच्याकडे उसंत नसते, कारण त्यांचे संपूर्ण जीवन केवळ उदरनिर्वाहासाठी कष्ट करण्यातच खर्ची पडते. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचे सर्व आयुष्य झिजून जाते, आणि त्यांना फक्त अश्रूंनीच साथ दिली जाते.
झोतभट्टीतील पोलादासारखे, कामगारांचे जीवनही अनेक संकटांत तावून सुलाखून निघते. भाकरीसाठी चाललेला हा संघर्ष त्यांच्या जीवनाचे विदारक सत्य आहे. तरीसुद्धा, कवीने स्पष्ट केले आहे की कामगार अश्रूंना मित्र मानून अडचणींवर मात करतो. स्वतःचे दु:ख पचवत तो इतरांना मदतीचा हात देतो, सामाजिक बांधिलकी जपतो, आणि दुनियेचा विचार करत जगमय होतो.

shaalaa.com
दोन दिवस
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official

RELATED QUESTIONS

कृती पूर्ण करा.

‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा.


एका शब्दांत उत्तर लिहा.

कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - ______


एका शब्दांत उत्तर लिहा.

कवीचा जवळचा मित्र - ______


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

माना उंचावलेले हात


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

कलम केलेले हात


खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’


'दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे', या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.


'कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात - 


पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो

दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

मुद्दे:

१. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३.कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा. (०२)

‘शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.’

४. कवितेत आलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. (०२)

१. रात्र -

२. साहाय्य -

३. शेकावे -

४. चंद्र -

५. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - (०२)


खालील ओळींचे रसग्रहण करा.

दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो.
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. दारिद्र्याकडे गहाण पडलेले - ______
  2. कवीचा जवळचा मित्र - ______

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. फुलले - 
  2. धुंद -
  3. झोतभट्टी - 
  4. पोलाद - 

४. काव्यसौंदर्य: (2)

‘हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’, या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.

मुद्दे ‘दोन दिवस’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘झोतभट्टीत शेकावे पोलाद। तसे आयुष्य छान शेकले।।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) वाळविले -
(ii) पेलावे - 
(iii) हरघडी - 
(iv) अगा -

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. दोन दिवस वाट पाहण्यात गेले; तर दोन गेले - ______
  2. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी झाली - ______

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. गहाण - 
  2. डोईवर - 
  3. झेतभट्टी -
  4. धुंद -

४. काव्या सौंदर्य: (2)

“दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलों”


खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘दोन दिवस’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. ‘हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले’
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (i) जिंदगी -
(ii) बरबाद - 
(iii) हरघडी - 
(iv) दुनिया - 

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×