Advertisements
Advertisements
Question
'कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
Advertisements
Solution
नारायण सुर्वे यांच्या 'दोन दिवस' या कवितेत कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करताना 'भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली', या शब्दांत कवीने भीषण जीवनसत्य मांडले आहे.
रोजची भूक भागवण्यासाठीही जिथे अपार कष्ट करावे लागतात, या पोटामागे संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते अशा कष्टकऱ्यांचे जीवन खूपदा सुखाची वाट पाहण्यात वाया जाते किंवा दु:खांशी झुंज देण्यात, अडचणींचा सामना करण्यातच निघून जाते. त्यांचे आयुष्य रणरणत्या उन्हाळ्याचे असते. पोटाची आग शांत करण्यासाठी त्यांना भाकरीच्या चंद्राची वाट पाहावी लागते, तिचा शोध घ्यावा लागतो. अशा कष्टकर्यांच्या जीवनातील व्यथा, वेदना मांडून कवीने जीवनसत्याचे दर्शन घडवले आहे. दु:खमय परिस्थितीतही सकारात्मक विचार करत आयुष्य जगणाऱ्या कामगाराचे चित्रण यात घडते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील ओळींचे रसग्रहण करा.
दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.
कृती पूर्ण करा.
‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा.
कृती पूर्ण करा.
कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
एका शब्दांत उत्तर लिहा.
कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - ______
एका शब्दांत उत्तर लिहा.
कवीचा जवळचा मित्र - ______
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
माना उंचावलेले हात
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
कलम केलेले हात
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’
'दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे', या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात -
पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)
|
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली; भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. |
मुद्दे:
१. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- (०१)
२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)
३.कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा. (०२)
‘शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.’
४. कवितेत आलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. (०२)
१. रात्र -
२. साहाय्य -
३. शेकावे -
४. चंद्र -
५. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - (०२)
खालील ओळींचे रसग्रहण करा.
दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो.
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.
| मुद्दे | ‘दोन दिवस’ |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
| (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘झोतभट्टीत शेकावे पोलाद। तसे आयुष्य छान शेकले।।’ |
| (iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| (v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) वाळविले - |
| (ii) पेलावे - | |
| (iii) हरघडी - | |
| (iv) अगा - |
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
| मुद्दे | ‘दोन दिवस’ |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| (2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
| (3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. | ‘हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले’ |
| (4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| (5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. | (i) जिंदगी - |
| (ii) बरबाद - | |
| (iii) हरघडी - | |
| (iv) दुनिया - |
