Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.
१९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनाची माहिती लिहा:
(अ) मुंबई अधिवेशन
(ब) महात्मा गांधीजींचे आवाहन
(क) आंदोलनाचे परिणाम
Very Long Answer
Advertisements
Solution
राष्ट्रीय सभेने ८ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिश सरकारला ‘चले जाव’ चा आदेश दिल्यावर भारतभर जी चळवळ सुरू झाली, तिला ‘चले जाव’ चळवळ असे म्हणतात.
(अ) मुंबई अधिवेशन:
- राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे ‘छोडो भारत’ (भारत छोडो) हा ठराव मंजूर केला.
- ७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले.
- पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ८ ऑगस्ट रोजी मांडलेला ‘चले जाव’ ठराव प्रचंड बहुमताने संमत झाला.
- या अधिवेशनात गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यांनी जनतेला ‘करो या मरो’ हा मंत्र दिला.
(ब) महात्मा गांधीजींचे आवाहन:
- ८ ऑगस्ट १९४२ रोजी राष्ट्रीय सभेने मुंबई अधिवेशनात ‘ब्रिटिशांनी तत्काळ भारत सोडावा’ अशी मागणी केली.
- गांधीजींनी जनतेला आवाहन केले की, हे आंदोलन केवळ राष्ट्रीय सभेचे नसून ते सर्व भारतीयांचे आहे.
- प्रत्येक स्त्री-पुरुषाने या क्षणापासून आपण स्वतंत्र आहोत असे मानून लढ्यासाठी सिद्ध व्हावे.
- ‘करेंगे या मरेंगे’ (करो या मरो) ही आपली सर्वांची प्रतिज्ञा असली पाहिजे.
- या स्वातंत्र्य-प्रतिज्ञेसाठी सर्वांनी प्रसंगी बलिदानाची तयारी ठेवावी.
(क) आंदोलनाचे परिणाम:
- चळवळ:
- गांधीजींच्या आवाहनाने संपूर्ण देशात नवचैतन्य निर्माण झाले.
- आंदोलन दडपण्यासाठी सरकारने ९ ऑगस्टच्या पहाटेच मौलाना आझाद, महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल यांसारख्या प्रमुख नेत्यांना अटक करून तुरुंगात डांबले.
- सरकारने सभा, मोर्चे, भाषणे आणि निदर्शने यांवर कडक बंदी घातली.
- सरकारी आदेश धुडकावून लावत जनतेने अत्यंत धैर्याने ही चळवळ पुढे नेली.
- देशात ठिकठिकाणी भूमिगत आंदोलने सुरू झाली आणि स्थानिक पातळीवर क्रांतिकारी गट सक्रिय झाले.
- आंदोलनासाठी गुप्त रेडिओ केंद्रे चालवली गेली आणि काही ठिकाणी प्रतिसरकारांची स्थापना झाली.
- परिणाम:
- या व्यापक जन आंदोलनामुळे ब्रिटिश सत्तेचा भारतातील पाया खिळखिळा झाला.
- यापुढे भारतात आपली सत्ता दीर्घकाळ टिकवता येणार नाही, याची स्पष्ट जाणीव ब्रिटिश सरकारला झाली.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
