Advertisements
Advertisements
Questions
जम्मू-काश्मीर मधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा.
खालील प्रश्नाचे उत्तर ८० ते १०० शब्दांत लिहा:
जम्मू-काश्मीर मधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा.
Explain
Advertisements
Solution 1
- अमानतुल्ला खान यांनी १९६५ साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये Plebiscite Front हा लष्करी गट स्थापन केला. १९७७ साली त्याचे नामकरण जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (Jammu-Kashmir Liberation Front) असे करण्यात आले.
- ही दहशतवादी संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करते. या गटास साहाय्य करण्यासाठी पाकिस्तानने हिजाबूल मुजाहिदीन या संघटनेच्या दहशतवादयांना भारतात पाठवले. त्यातून आझादीचा लढा हा Pan- Islamic लढा बनला.
- पाकिस्तानातील IIS ही सरकारी संघटना दहशतवाद्यांना लष्करी रसद व आर्थिक पाठबळ पुरवते. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असन राजकीय अस्थेर्य निर्माण झाले आहे.
- भारतीय सैन्याद्वारा या सीमापारच्या दहशतवादाला चोख उत्तर दिले जात आहे.
shaalaa.com
Solution 2
- भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार (Indian Independence Act, 1947) संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घ्यावयाचा होता.
- १९७७ मध्ये या Plebiscite Front ला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (Jammu-Kashmir Liberation Front) असे नवीन नाव देण्यात आले. १९८९ मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आणि JKLF नेतत्कालीन गृहमंत्र्यांच्या कन्या रुबिया सैद यांचे अपहरण केले. जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी ही JKLF ची प्रमुख मागणी होती.
- काश्मीरमधील पाकिस्तानवादी गनिमी गटांना मदत करण्यासाठी पाकिस्तानने हिज्बूल मुजाहिद्दींना तेथे पाठवण्याचा निर्णय घेतला.
- वाढलेल्या इस्लामी आक्रमतेमुळे १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर जो अत्याचार झाला त्यामुळे काश्मिरी पंडितांनी काश्मीरमधून स्थलांतर केले.
- भारत-पाक संबंधांमध्ये सीमापार दहशतवाद हा नेहमीच सर्वांत महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे.
shaalaa.com
जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद
Is there an error in this question or solution?
