Advertisements
Advertisements
Question
अभिव्यक्ती
तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा.
Advertisements
Solution
आम्ही पर्जन्यछायेच्या प्रदेशात, म्हणजेच दुष्काळी भागात राहतो. आमची सारी उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे. पाऊस पडला नाही की आमची दयनीय परिस्थिती होते. पाऊस येण्यापूर्वी आमच्याकडे कडक उन्हाळा असतो. नदी, नाले, विहिरी आटून रोडावतात. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पिण्यासही पाणी मिळत नाही. गुराढोरांचे हाल होतात. त्यांना चारा मिळत नाही. झाडे सुकतात. सर्वत्र पाचोळा होतो. पक्षी दिसेनासे होतात. डोंगर बोडके होतात. सर्वत्र रखरखाट होतो. ऊन अंग जाळत जाते. डोळे नि मन थकून निराश होते. लहानग्या मुलांना अन्नाचा घास मिळत नाही. शेतजमीन तडकते. तिला भेगा पडतात. डोहामध्ये खड्डे खणून जेमतेम पाणी मिळते. घशाला कोरड पडते. आकाश आग ओकीत राहते. पावसाच्या प्रतीक्षेत जो तो आकाशाकडे डोळे लावून बसतो. काही शेतकरी स्थलांतर करतात. गाव भकास होते. जीवनेच्छा मालवून जाते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
चौकटी पूर्ण करा.
कवयित्रीने जिला विनंती केली ती - _________
चौकटी पूर्ण करा.
कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा - _________
चौकटी पूर्ण करा.
शेतात रमणारी व्यक्ती - _________.
कारण लिहा.
बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण ..........
कारण लिहा.
बाळांची तोंडे कोमेजली; कारण .............
पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा:
ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर
पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा :
तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशीं
पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा :
विहिरीच्या तळीं खोल दिसूं लागलें ग भिंग
खालील तक्त्यात सुचवल्यानुसार कवितेच्या ओळी लिहा.
| प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळी | प्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणाऱ्या ओळी | प्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे हे दर्शवणाऱ्या ओळी | मालकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आवाहन करणाऱ्या ओळी |
खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
‘कां ग वाकुडेपणा हा,
कां ग अशी पाठमोरी?
ये ग ये ग प्राणसई
वाऱ्यावरून भरारी’
खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
'शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नांवर'
कवयित्रीने उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा.
'कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे,' हे स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा.
अभिव्यक्ती.
पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो, ते लिहा.
प्राणसई’ या कवितेचे रसग्रहण करा.
