मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात.

१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

१. विद्यार्थ्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सवयी-

  • चांगले साहित्य वाचणे
  • योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणे
  • योग्य ठिकाणी खर्च करणे
  • आवश्यक तेवढेच बोलणे
  • नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणे

२. स्वप्रयत्नांच्या बळावर, चांगल्या सवयी असणारी व्यक्ती समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करते आणि स्वत: निवडलेल्या क्षेत्रात हमखास यश मिळवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन होय.

गणिताची प्रचंड आवड असणाऱ्या रामानुजन यांना शालेय जीवनापासूनच गणिते सोडवणे व विविध गणिती सूत्रांच्या अभ्यासातून नवीन सूत्रे बनवण्याची सवय लागली होती. त्यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी गणितच असे. कदाचित म्हणूनच, रामानुजन झोपेतून जागे झाल्यावर अचानक अवघड सूत्रे लिहून काढत. आपल्याला प्रा. हार्डी या नामवंत गणितज्ज्ञाचे मार्गदर्शन मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रा. हार्डींशी पत्रव्यवहार करून आपली ही इच्छा प्रदर्शित केली, कठोर मेहनत घेतली. त्यांच्यासारख्या असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या मेहनती मुलाला प्रा. हार्डींचे मार्गदर्शन मिळालेच शिवाय इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्तीही मिळाली. या तीन वर्षांच्या काळात त्यांनी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांना रॉयल सोसायटीसारख्या सन्माननीय संस्थेचे सदस्यत्व बहाल केले गेले.
वरील उदाहरणावरून, चांगल्या सवयी व स्वप्रयत्न यांमुळे व्यक्तिमत्त्व घडते हे स्पष्ट होते.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: दिव्याच्या शोधामागचे दिव्य - अपठित गद्य आकलन [पृष्ठ २६]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य
अपठित गद्य आकलन | Q १. | पृष्ठ २६

संबंधित प्रश्‍न

जोड्या जुळवा.

पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा.

धीट, हजर, सुंदर, स्तुती भित्रा, गैरहजर, कुरूप, निंदा

 

  अ 
(१)    
(२)    
(३)    
(४)    

खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) कोलाहल (अ) प्रवासी
(२) तऱ्हेवाईक (आ) विचित्र
(३) मुसाफिर (इ) प्रेरित
(४) उद्युक्त (ई) गोंधळ

वाक्य पूर्ण करा.

इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________


‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.


______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.


संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.


कंसातील सूचनेनुसार बदल करा.

याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)


सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.


'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.


व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.


पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.


फरक स्पष्ट करा.

दक्षिणेतील हवामान उत्तरेतील हवामान
(१) (१)
(२) (२)
(३) (३)

वाक्य पूर्ण करा.

बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -


कारणे लिहा.

हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....


‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.


झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.


लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.


खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.

परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.


‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×