Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
प्रभात या कवितेत कवी किशोर बळी यांनी नव्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आपण सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या ज्ञानाचा सदुपयोग करून आपल्यातील कलागुणांचा विकास घडवावा व भेदाभेद मिटवून देशाला प्रगतिप्रथावर न्यावे असा संदेश दिला आहे. माहितीचा, ज्ञानाचा वाहता झरा या नव्या विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला लाभला आहे. यामुळे, आपल्या कलागुणांचा विकास घडवण्याची संधी प्रत्येकाला प्राप्त होत आहे. विश्वाच्या पसाऱ्यातील प्रत्येक व्यक्ती नवी स्वप्ने पाहत आहे. ती स्वप्ने पूर्ण करण्याची, सत्यात उतरवण्याची, साकार करण्याची इच्छा, आशा मनात बाळगत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची झालेली प्रगती व सर्वसामान्यांचे बदललेले जीवन पाहता नक्कीच झपाट्याने परिवर्तन घडत आहे, असे वाटते. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे या नव्या युगात सर्वच क्षेत्रात झालेला लक्षणीय विकास जणू प्रगतीची नवीन परिभाषा साकार करत आहे, असा अर्थ कवी व्यक्त करतो.
संबंधित प्रश्न
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| पसरणारा सुवास → | कशाचा | ______ |
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| पायाभरणी → | कशाची | ______ |
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ______
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
नभात-
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
मनोहर -
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
अस्तित्वाची-
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।
परिणाम लिहा.
बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
चुकलीमुकली लकेर -
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पाचूचे मखमली शेत -
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेचा विश्रांतीचा प्रहर-
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू -
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
झुळुकेची परोपकारी वृत्ती
स्वमत.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
