Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
प्रभात या कवितेत कवी किशोर बळी यांनी नव्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आपण सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या ज्ञानाचा सदुपयोग करून आपल्यातील कलागुणांचा विकास घडवावा व भेदाभेद मिटवून देशाला प्रगतिप्रथावर न्यावे असा संदेश दिला आहे. माहितीचा, ज्ञानाचा वाहता झरा या नव्या विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला लाभला आहे. यामुळे, आपल्या कलागुणांचा विकास घडवण्याची संधी प्रत्येकाला प्राप्त होत आहे. विश्वाच्या पसाऱ्यातील प्रत्येक व्यक्ती नवी स्वप्ने पाहत आहे. ती स्वप्ने पूर्ण करण्याची, सत्यात उतरवण्याची, साकार करण्याची इच्छा, आशा मनात बाळगत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची झालेली प्रगती व सर्वसामान्यांचे बदललेले जीवन पाहता नक्कीच झपाट्याने परिवर्तन घडत आहे, असे वाटते. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे या नव्या युगात सर्वच क्षेत्रात झालेला लक्षणीय विकास जणू प्रगतीची नवीन परिभाषा साकार करत आहे, असा अर्थ कवी व्यक्त करतो.
संबंधित प्रश्न
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
मनोहर -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
अखंड -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
आकाश -
‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।
भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.
उदा., (१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.
(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.
या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.
आकृती पूर्ण करा.

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पाचूचे मखमली शेत -
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू -
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-
आकृती पूर्ण करा.

कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
| कवीला जगणे शिकवणारे घटक | या घटकांपासून कवी काय शिकले |
| (अ) चंद्र, चांदणे | (अ) |
| (आ) पणती | (आ) |
| (इ) नदी | (इ) |
| (ई) पक्षी | (ई) |
| (उ) सागर | (उ) |
| (ऊ) वृक्ष | (ऊ) |
स्वमत.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
स्वमत.
'दुसऱ्यासाठी घाव सोसणे' या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ.
निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा.
