Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
निसर्ग हा आपला गुरू आहे. या निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काही ना काही शिकवत असतो. निसर्ग ही एक बिनभिंतीची, उघडी शाळाच आहे. येथील लाखो घटक आपले गुरू आहेत. झाड आपल्याला परोपकारी वृत्ती, सहनशीलता, स्थितप्रज्ञता शिकवते, तर मुंगीत आपल्याला चिकाटी, जिद्द या गुणांचे दर्शन घडते. समुद्राची विशालता पाहिली की आपणही असे विशाल, व्यापक बनायला हवे हा विचार मनात येतो, तर फुलाकडून आपण टवटवीतपणा, चैतन्य, वातावरणात सुगंध भरण्याचा, आनंद निर्माण करण्याचा गुण शिकू शकतो. फुलपाखरूही आपल्या छोट्याशा जीवनकाळात जीवनातला रंगीबेरंगीपणा जपण्याची व आनंद लुटत जगण्याची शिकवण देते. मधमाशी, सुगरणपक्षी, गवत असा निसर्गातील प्रत्येक लहानातला लहान घटकही आपल्याला काहीतरी शिकवत असतो. अशाप्रकारे, निसर्गाच्या या भिंती नसलेल्या, मोकळ्या, प्रसन्न शाळेतील विविध गुरू त्यांच्या गुणांची शिकवण देऊन आपले जीवन समृद्ध करतात.
संबंधित प्रश्न
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| पायाभरणी → | कशाची | ______ |
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ______
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -
योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) नव्या युगाच्या नभात | (अ) व्यक्तित्वाची जडणघडण |
| (२) प्रतिभेची प्रभात | (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे. |
| (३) पायाभरणी अस्तित्वाची | (इ) नवनिर्मितीची पहाट |
| (४) व्यक्तित्वाची प्रयोगशाळा | (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात |
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
किनारा -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
अखंड -
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ______.
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पाचूचे मखमली शेत -
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-
आकृती पूर्ण करा.

कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
| कवीला जगणे शिकवणारे घटक | या घटकांपासून कवी काय शिकले |
| (अ) चंद्र, चांदणे | (अ) |
| (आ) पणती | (आ) |
| (इ) नदी | (इ) |
| (ई) पक्षी | (ई) |
| (उ) सागर | (उ) |
| (ऊ) वृक्ष | (ऊ) |
