Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’, हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
निसर्ग हा आपला गुरू आहे. या निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काही ना काही शिकवत असतो. निसर्ग ही एक बिनभिंतीची, उघडी शाळाच आहे. येथील लाखो घटक आपले गुरू आहेत. झाड आपल्याला परोपकारी वृत्ती, सहनशीलता, स्थितप्रज्ञता शिकवते, तर मुंगीत आपल्याला चिकाटी, जिद्द या गुणांचे दर्शन घडते. समुद्राची विशालता पाहिली की आपणही असे विशाल, व्यापक बनायला हवे हा विचार मनात येतो, तर फुलाकडून आपण टवटवीतपणा, चैतन्य, वातावरणात सुगंध भरण्याचा, आनंद निर्माण करण्याचा गुण शिकू शकतो. फुलपाखरूही आपल्या छोट्याशा जीवनकाळात जीवनातला रंगीबेरंगीपणा जपण्याची व आनंद लुटत जगण्याची शिकवण देते. मधमाशी, सुगरणपक्षी, गवत असा निसर्गातील प्रत्येक लहानातला लहान घटकही आपल्याला काहीतरी शिकवत असतो. अशाप्रकारे, निसर्गाच्या या भिंती नसलेल्या, मोकळ्या, प्रसन्न शाळेतील विविध गुरू त्यांच्या गुणांची शिकवण देऊन आपले जीवन समृद्ध करतात.
संबंधित प्रश्न
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| सुंदर जग → | कोणाचे | ______ |
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| पायाभरणी → | कशाची | ______ |
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ______
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.
(अ) आकाश-
(आ) सुगंध-
(इ) सुंदर-
(ई) शरीर-
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
किनारा -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
इच्छा -
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।
भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.
उदा., (१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.
(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.
या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.
परिणाम लिहा.
बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पाचूचे मखमली शेत -
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू -
आकृती पूर्ण करा.

कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
| कवीला जगणे शिकवणारे घटक | या घटकांपासून कवी काय शिकले |
| (अ) चंद्र, चांदणे | (अ) |
| (आ) पणती | (आ) |
| (इ) नदी | (इ) |
| (ई) पक्षी | (ई) |
| (उ) सागर | (उ) |
| (ऊ) वृक्ष | (ऊ) |
