Advertisements
Advertisements
प्रश्न
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
Advertisements
उत्तर
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील प्रस्तुत काव्यपंक्तींद्वारे कवी वसंत बापट यांना कष्टकऱ्यांमधील माणुसकीचे नाते अधोरेखित करायचे आहे.
आपापसांतील माणुसकीचे नाते अखंड टिकून असल्यामुळे कष्टकरी वर्गात कोणत्याच प्रकारचा भेदभाव नाही. 'श्रम' करणे हेच त्यांचे इमान आहे. कष्टावरच त्यांची निष्ठा आहे. कष्ट हीच त्यांची ओळख, कष्ट हाच धर्म आहे. कष्ट करून आपले पोट भरणे हाच त्यांचा मार्ग आहे. कष्टातून मिळणारा आनंद हेच त्यांच्यासाठी स्वर्गसुख आहे. त्यामुळे, कष्टाशिवाय त्यांना वेगळा असा दुसरा धर्म, पंथ, जात, मार्ग नाही. या कष्टांच्या बळावरच ते स्वत:चे भाग्य लिहू शकतात, असा दुर्दम्य आत्मविश्वास कवी प्रस्तुत ओळींतून व्यक्त करत आहे.
संबंधित प्रश्न
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
| पसरणारा सुवास → | कशाचा | ______ |
योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) नव्या युगाच्या नभात | (अ) व्यक्तित्वाची जडणघडण |
| (२) प्रतिभेची प्रभात | (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे. |
| (३) पायाभरणी अस्तित्वाची | (इ) नवनिर्मितीची पहाट |
| (४) व्यक्तित्वाची प्रयोगशाळा | (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात |
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
अस्तित्वाची-
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
किनारा -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
इच्छा -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
अखंड -
'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.
उदा., (१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.
(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.
या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ______.
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेचा विश्रांतीचा प्रहर-
आकृती पूर्ण करा.

कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
| कवीला जगणे शिकवणारे घटक | या घटकांपासून कवी काय शिकले |
| (अ) चंद्र, चांदणे | (अ) |
| (आ) पणती | (आ) |
| (इ) नदी | (इ) |
| (ई) पक्षी | (ई) |
| (उ) सागर | (उ) |
| (ऊ) वृक्ष | (ऊ) |
निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा.
