Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।
Advertisements
उत्तर
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवी वसंत बापट यांच्या कवितेत कवीने कष्टकऱ्यांचे जीवन मांडले आहे.
कष्टकरी हे निसर्गाचे सुपुत्र आहेत. मोकळे आकाश हे त्यांना पित्यासमान, तर काळी माती त्यांना मातेसमान आहे. आभाळाची व जमिनीच्या मायेची छत्रछाया त्यांना लाभते, त्यांचे भरणपोषण होते. ते निसर्गात वाढतात. निसर्ग हा नियमित व अथकपणे आपले कार्य करत राहतो. त्याचप्रमाणे निसर्गाची लेकरे असणारे कष्टकरी नियमित व अथकपणे कष्ट करत राहतात. कष्ट करणे हीच त्यांची ओळख, कष्ट हाच त्यांचा देव, कष्ट हाच त्यांचा धर्म, म्हणून त्यांना वेगळी जात नाही किंवा त्यांचा वेगळा धर्म नाही, असे प्रस्तुत ओळींद्वारे कवीला म्हणायचे आहे.
संबंधित प्रश्न
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
नभात-
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
युगात -
खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.
(अ) आकाश-
(आ) सुगंध-
(इ) सुंदर-
(ई) शरीर-
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
किनारा -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
इच्छा -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
अखंड -
‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.
आकृती पूर्ण करा.

