Advertisements
Advertisements
Question
वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हांला वाटते ते लिहा.
Advertisements
Solution
वाळवंटासारख्या कोरड्या, ओसाड प्रदेशात वनस्पतींचे प्रमाण खूपच कमी असते. उष्ण हवामान, रेताड माती, पाण्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून वाळवंटातील वनस्पतींनी आपले अस्तित्व टिकवून ठेवलेले असते. कॅक्टससारख्या झाडाने आपल्या शरीराच्या आतील भागात रसदार गराच्या स्वरूपात पाण्याचा साठा केलेला असतो. त्या रसदार गरासाठी प्राणी ह्या झाडावर हल्ला करण्याची शक्यता असते. असे झाल्यास ही झाडे नष्ट होण्याचा धोका असतो. त्यामुळे, स्वसंरक्षणासाठी येथील झाडांवर काटे असतात. हे काटे त्यांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी शस्त्रांप्रमाणे उपयोगी ठरतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘निसर्ग हा मोठा जादूगर आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते ‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.
‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!’ या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.
टिपा लिहा.

‘पाणी हेच जीवन!’ या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.
टिपा लिहा:
सग्वारो कॅक्टस
‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाच्या आधारे कॅक्टसच्या प्रकारांची माहिती थोडक्यात लिहा.
