English

तुमचे मत लिहा. पर्यटन स्थळांची काळजी सर्वांनी घ्यावी. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

तुमचे मत लिहा.

पर्यटन स्थळांची काळजी सर्वांनी घ्यावी.

Long Answer
Advertisements

Solution

देशाच्या विकासात पर्यटन स्थळांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. हे महत्त्व प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे.

  1. पर्यटन स्थळे हा आपल्या देशाचा अनमोल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाचा ठेवा आहे.
  2. आपले ऐतिहासिक किल्ले, वास्तू, लेणी आणि समृद्ध निसर्ग हे आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात; हे वैभव पाहण्यासाठी जगभरातून हजारो पर्यटक भारतात येतात.
  3. आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या माध्यमातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होते, जे अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
  4. पर्यटनामुळे हजारो व्यवसाय निर्माण होतात व त्यातून रोजगार निर्माण होतात.
  5. स्थानिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित होतात. कला उदयोगांना चालना मिळते, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था अधिक विकसित आणि सक्षम होते.
  6. पर्यटन स्थळांची काळजी केवळ सरकारने घेऊन चालणार नाही. ती प्रत्येकानेच घेतली पाहिजे. अन्यथा वरील सर्व पर्यटनाचे फायदे आपल्याला व देशाला होणार नाहीत.
shaalaa.com
सामाजिक क्षेत्र - पर्यावरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: बदलता भारत - भाग २ - स्वाध्याय [Page 98]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 12 बदलता भारत - भाग २
स्वाध्याय | Q ६.२ | Page 98
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×