English

संसद मंत्रिमंडळावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवते? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

संसद मंत्रिमंडळावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवते?

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. चर्चा, विचार-विनिमय, प्रश्नोत्तरे आणि अविश्वास प्रस्ताव यांसारख्या विविध मार्गांनी संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते.
  2. मंत्रिमंडळाला कोणतेही धोरण किंवा कायद्याची अंमलबजावणी करायची असल्यास त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणावी लागते. अशा वेळेस अनेकदा काही मुद्यांवरून मतभेद दिसतात. सभासदांचे समाधान न झाल्यास ते सभा त्यागही करतात.
  3. अधिवेशन काळातील दुपारी १२ चा वेळ शुन्य प्रहर म्हणून ओळखला जातो. या वेळी सार्वजनिकदृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणता येते.
  4. याशिवाय मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे अविश्वास ठराव. सरकारचे एखादे धोरण सदस्यांना खटकणारे असेल तर ते सरकारवर अविश्वास ठराव आणू शकतात. असे झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: केंद्रीय कार्यकारी मंडळ - स्वाध्याय [Page 151]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 10 केंद्रीय कार्यकारी मंडळ
स्वाध्याय | Q ४. (२) | Page 151
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×