Advertisements
Advertisements
Question
‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे’. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
Advertisements
Solution
समईची ज्योत ही देवापुढे, गर्भगृहाच्या आत ठेवलेली असते. तेव्हा तिची काळजी घेतली जाते की ती सदासर्वकाळ जळत राहील. त्यामुळेच ती सतत तेवत असते. यातून समईच्या स्वभावातील सातत्य दिसून येते. तिची इच्छा असत नाही की संपूर्ण घर, मोठे वाडे किंवा सर्व परिसर प्रकाशित करावा. ती फक्त देवघरातील किंवा मंदिरातील गर्भगृह उजळून टाकते. तिचा प्रकाश हा मंद असतो, पण तो डोळ्यांना सुखकारक आणि मनाला शांत व थंड करणारा असतो. मर्यादित राहाणे हा जणू तिचा जन्मसिद्ध धर्मच आहे. म्हणूनच तिला संयमी म्हणता येते. तिच्या प्रकाशात असलेला परिसर हा काहीतरी उंच आणि उदात्त भावनेने भरलेला असतो. ही भावना माणसाला खूप मोठे समाधान देते. हेच तर समईचे खरे सामर्थ्य आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख - ______
आयुष्याचा पाया भक्कम करणारे - ______
खालील घटनांचे परिणाम लिहा.
| घटना | परिणाम | |
| (अ) | ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. | |
| (आ) | ताराबाईंचे निधन. | |
| (इ) | अनुताईंचे निधन. |
का ते लिहा.
शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.
का ते लिहा.
अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
भातुकलीचा खेळ
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
ज्ञानगंगा
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
व्रताने स्वत:ला बांधणाऱ्या - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
नेमाने स्वत:ला बांधणारा - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
गावातील रहिवासी - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
तिऱ्हाइताच्या भूमिकेतून बघणारा - ______
अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा.
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या कोणत्याही एका संस्थेची माहिती मिळवा.
