English

सेंद्रीय शेतीमध्ये जैव किटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

सेंद्रीय शेतीमध्ये जैव किटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा.

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. जैव कीटकनाशके वापरल्यास भू-प्रदूषण होत नाही. अन्यथा रासायनिक खतांमुळे मोठ्या प्रमाणावर भू-प्रदूषण होत असते.
  2. रासायनिक कीडनाशके व कीटकनाशके यातून फ्लुरासिटामाइडसारखी रासायनिक द्रव्ये मातीत मिसळत असतात. ही वनस्पती व गुरांसाठी घातक असणारी रसायने सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने नष्ट करण्यात येतात.
  3. कवके व विषाणूंच्या काही प्रजाती जैव कीटकनाशके म्हणून वापरता येतात.
  4. जीवाणू व कवक यांच्यात पिकांवरील कीड, कीटक, रोगजंतूंचा नाश करणारी द्रव्ये असतात.
  5. ही टॉक्झिन्स द्रव्ये जीवाणूंपासून आणि कवकांपासून मिळवली जातात आणि जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्पतींमध्येच अंतर्भूत केली जातात. कीटकांसाठी ही विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाहीत. यामुळे पिकांचे आपोआपच संरक्षण होते. उदा., किण्वन प्रक्रियेत मिळणारे उप-उत्पादन, स्पायनोसॅड.
shaalaa.com
सूक्ष्‍मजीव व शेती
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - स्वाध्याय [Page 86]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
स्वाध्याय | Q 3. ई. | Page 86
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×