English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते. नव्या पिढीला - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)

आकलन कृती

१. उत्तर लिहा. (०२)

  1. ग्रंथपालांना काय संबोधले आहे?
  2. फुले म्हणजे निसर्गाची कोणती अभिव्यक्ती आहे असे लेखक म्हणतो?

पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते.

नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य!

या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात.

२. आकलन कृती 

  १. पुढील आकृतिबंध पूर्ण करा. (०२)

Answer in Brief
Advertisements

Solution

१.

  1. ग्रंथपालांना 'ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल' असे संबोधले आहे. 
  2. या प्रश्नाचं उत्तर या उताऱ्यात नाही.

२.

  १.

shaalaa.com
अपठित गद्यांश
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: अपठित गद्य - कृती क्रमांक:१

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi (Second Language) 10 Standard SSC
Chapter 17 अपठित गद्य
कृती क्रमांक:१ | Q १. इ.

RELATED QUESTIONS

उतारा वाचून दिलेल्या कृती करा.

(अ) तक्ता पूर्ण करा.

जंगलाचा स्वभाव  माणसाचा स्वभाव
(१) ______ (१) ______
(२) ______ (२) ______

 

जंगलाने सर्वांचे स्वागत केले-दिलखुलास, मनमोकळे. जंगलाचा स्वभावच असा मोकळाढाकळा असतो. अढी धरावी, तेढ बाळगावी यासाठीसुद्धा एखादा कोपरा लागतो. जंगलाला असा कोपरा नसतो. माणसं आणि त्यांची घरं यांना कोपरे असतात म्हणून ती जंगलाइतकी मुक्त, मोकळी नसतात. जंगल मनमोकळे असते. सहजसुंदर असते. ऊनपावसाशी ते लपंडाव खेळते. थंडीवाऱ्याशी गप्पा मारते. फुलताना, खेळताना, डुलताना, हसताना ते मनापासून सगळे काही करते. एप्रिलचा हा महिना, उन्हाळ्याचे दिवस, भामरागडच्या जंगलाची वेश बदलण्याची वेळ, तर त्या जंगलाने अंगाखांद्यावरची पर्णभूषणे ढाळलेली दिसली. त्यातही संकोच नाही, की संशय नाही. त्यामुळे जमीन दिसू नये इतका हातभर खाली वाळलेल्या पानांचा सुदूर सडा. राखाडी, पिंगट रंगाचा. वारा हलकेच त्यात शिरायचा तेव्हा सळसळ आवाज व्हायचा. नागमोडी पाऊलवाटेने जेव्हा पावले त्यावर पडायची तेव्हा त्यातून चर्रचर्र आवाज उठायचा. जणू जंगल बोलते आहे असे वाटते. जंगल कुजबुजते आहे असे भासते. वेळूच्या घनदाट बनात वारा घुमतो तेव्हा तो गाणे होऊनच घुमत घुमत बाहेर पडतो. पानं, फांद्या, फुलं सर्वांनीच जंगल हसते, गाते आणि डुलते. पावसाच्या सरी झेलते. सचैल न्हाते. भिजत चिंब होऊन जाते.

-राजा मंगळवेढेकर.

(आ) चौकटी पूर्ण करा.

(इ) खालील कृती करा.

(१) खालील शब्दांची जात ओळखा.

(i)  
(ii) 

(२) सूचनेप्रमाणे सोडवा.
(i) जंगल मनमोकळे असते. (काळ ओळखा.)
(ii) सहसंबंध लिहा. - कोपरे : `square` पाने : पान

  • स्वमत.
    जंगलाचा मनमोकळा स्वभाव सोदाहरण स्पष्ट करा.

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)

आकलन कृती

१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

  1. परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे.
  2. झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.

चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत.

ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे.

२. आकलन कृती 

  १. सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (०२)

  1. पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी ______
  2. हृदयाला आनंद बहाल करणारा ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) उत्तर लिहा.  (२)

  1. ग्रंथपालांना काय संबोधले आहे?
  2. फुले म्हणजे निसर्गाची कोणती अभिव्यक्ती आहे असे लेखक म्हणतो?

पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते.

नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य!

या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात.

२) पुढील आकृतिबंध पूर्ण करा. (२)

  ←नव्या पिढीला माणूसपणाच्या सुंदरतेकडे नेणारे→  

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) एका वाक्यात उत्तरे लिहा.  (२)

  1. परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे.
  2. झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.

चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाई तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत.

ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे.

२) सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (२)

  1. पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवा ______
  2. हृदयाला आनंद बहाल करणारा ______

उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

१. आकृती पूर्ण करा. (२)

आनंदवनामध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले, राहण्यासाठी झोपड्या बांधणे. अन्नधान्यासाठी शेती करणे यापासून अनेक पूरक उद्योग त्यांनी सुरू केले. अर्थात्‌ ही प्रक्रिया सोपी नव्हती अनेक अडचणी होत्या. पण त्यावर मात करत बाबांनी भंगलेल्या शरीरांना, खचलेल्या मनांना जगण्याची उभारी दिली. ताठ मनाने जगण्याची प्रेरणा दिली. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोग्यांवर उपचार केले, त्यांना निवास उपलब्ध करून दिला. शिवाय त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी साधने उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांना कष्टाची भाकरी मिळवता आली. त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यामुळे दैवाने मोडतोड केलेल्या चेहऱ्यांवर हास्य उमलले. हे हास्य समाधानाचे, आत्मविश्वासाचे होते.

बोटं झडलेल्या थिट्या हातांना कामाची सवय लागावी आणि स्वाभिमानाचा ताठ कणा. लाभावा यासाठी ‘आनंदवनाची’ धडपड असते.

आनंदवन उभारताना बाबांनी आतोनात कष्ट घेतल त्यामुळेच गेली सहा दशके तिथे महारोगाने, अंधत्वाने, अपंगत्वाने झाकोळून गेलेली जीवने उजळून निघाली. जन्माला येतानाच उपेक्षा घेऊन आलेल्या जीवांमध्ये ‘सुंदर मी होणार’ यासोबत ‘सुंदर मी करणार’ हा मंत्र आनंदवनने जोपासला.

२. योग्य जोड्या लावा: (२)

‘अ’ गट ‘ब’ गट
(i) भंगलेली (i) भाकर
(ii) खचलेली (ii) जीवने
(iii) कष्टाने मिळवलेली (iii) मने
(iv) झाकोळलेली (iv) शरीरे

३. व्याकरण:

(i) खालील वाक्यांतील विशेषणे शोधून लिहा: (१)

(अ) त्यांना ताठ मनाने जगण्याची प्रेरणा मिळाली.

(ब) त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले.

(ii) खालील सर्वनामांचा वाक्यात उपयोग करा: (१)

(अ) तू

(ब) तुझा

४. स्वमत: (२)

‘सुंदर मी करणार’ या आनंदवनाने जोपासलेल्या मंत्राचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.


खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) चौकटी पूर्ण करा: (2)

(य) अर्थयुक्त असणारे - ______

(र) अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्यकृतीचा उलगडतो तो - ______

साहित्यकृती शब्दांनी बनलेली असते. शब्द अर्थयुक्त असतात. तो अर्थ एकपदरी अथवा अनेकपदरी असतो. प्रतिमा, प्रतीक हे ही शब्दच असतात. त्यात एकाहून अधिक अर्थ असतात. भाषेतील रूपकप्रक्रियेने अर्थाचे विश्व व्यापक केलेले असते. शब्दांच्या साहाय्याने साहित्यकृतीत पात्रे, प्रसंग, वातावरण निर्माण केलेले असते. शब्दार्थजनित कल्पित विश्वाची निर्मिती साहित्यकृतीत होत असते. त्या विश्वाचे बाह्य जगाशी साधर्म्य किंवा वैधर्म्य असते. अनेक शब्दांच्या अर्थांमधून साहित्यकृतीचा आशय उलगडतो. मिथक, आदिबंध यांनी त्या आशयाला एक परिमाण दिलेले असते; तर शब्दांच्या अर्थांतून व्यक्त होणाऱ्या विचारप्रणालीने, जीवनविषयक भूमिकेने दुसरे परिमाण दिलेले असते. साहित्यकृतीत विविध व्यक्ती, समाजगट, व्यक्तीची मने, व्यक्ती आणि समाजगट यांच्यातील संबंध शब्दार्थांतून व्यक्त झालेले असतात. व्यक्तींना, व्यक्तिसमूहांनां सामाजिक संदर्भ असतो. त्या समाजगटाची, समाजाची विशिष्ट संस्कृती असते. माणसांच्या सर्वसाधारण व्यवहारात 'बोलणे' हा एक महत्त्वाचा व्यवहार असतो. ते बोलणे अगदी साधे. निर्देशात्मक, भावनात्मक, विचारप्रदर्शनात्मक, प्रतिक्रियात्मक, आंतर असे असू शकते.

- वसंत आबाजी डहाके  

(२) खालील कृती करा: (२)

माणसाची व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्ये लिहा:

(य) ______

(र) ______


(१) उतारा वाचून त्यावरील कृती करा.

(अ) वैशिष्ट्ये लिहा.

विद्वत्ता कोणाकडेही असो ती क्षणात मिळवता येणारी बाब नाही. ज्याप्रमाणे झाडाची मुळे एकदम खोल-खोल जाऊ शकत नाहीत, त्यासाठी महिने-वर्षे लागतात; परंतु जेवढी खोल मुळे असतात, तेवढा त्या झाडाचा पाया भक्कम असतो. तसेच विद्वत्तेचेही आहे. जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्त्व असेल. आपल्याला एकदाच विजेसारखे चमकायचे, की सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे, हे ठरवायचे आहे. विद्वत्ता ही अशी बाब आहे, जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. बरे, तिला कोणी तुमच्याकडून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही; पण एकदा ती तुमच्याजवळ आली, की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते, सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. थोडक्यात, विद्वत्ता तुम्हांला सर्व मिळवून देते, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते.

(आ) खालील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम लिहा.

घटना/कृती परिणाम
(१) झाडाची मुळे खोल जाणे. (१) ____________
(२) प्रयत्नांनी विद्या मिळवणे. (२) ____________

(इ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
(१) विजेसारखे चमकणे -
(२) सूर्यासारखे प्रकाशणे -

(२) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.

(१) संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशाने दिपून जाईल.

(३) व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात ते स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. योग्य जोड्या लावा. (2)

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) हिरा विद्वान
(ii) शिल्पकार श्रोतृगण
(iii) विषयतज्ज्ञ खाण
(iv) भाषण प्रबुद्ध
(v) प्रौढ शिल्पकला

 

           मनुष्याच्या अंगी कोणताही गुण असला तरी परिश्रमाखेरीज व अभ्यासाखेरीज त्याचे तेज कधीही पडावयाचे नाही. खाणीतून नुकताच खणून काढलेला हिरा जसा मुळात तेजस्वी नसून शिल्पकारांच्या संस्कार प्रयोगांची त्याला खास अपेक्षा असते त्याचप्रमाणे गुणीजनांच्या अंगी असणारी कलाही शिक्षणाखेरीज पूर्वत्वाने कधी प्रकट होत नसते. असो, तर वक्‍तृत्व हे जरी मनुष्याच्या अंगी जन्मसिद्धच असले पाहिजे, तरी ते तसे कोणाचे ठायी असतानाही विद्वत्तेखेरीज ते पूर्ण शोभा कधीही द्यावयाचे नाही. विद्वान व रसिक लोकांना तुष्ट करून त्यांची मते आपल्या भाषणाने ज्यास वळवावयाची असतील त्याने भाषाशुद्धता, अर्थसंगती, सुंदर व प्रौढ विचार मोठमोठया नामांकित काव्यांचे, नाटकांचे व इतिहासाचेही ज्ञान संपादन करून त्याच्याशी त्याने सतत परिचय केला पाहिजे. याखेरीज इतर अनेक विषयांची माहिती त्याला असली तर चांगलीच कारण दृष्टान्त वगैरे देण्यास व भाषणास वैचित्रय व मनोरंजकता आणण्यास ती फार उपयोगी पडते. आणखी एक प्रभावी साधन म्हणजे अनुकरण. कोणताही गुण साध्य करून घेण्यास अनुकरणासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही.

२. एका शब्दात उत्तेर लिहा. (2)

  1. गु्णीजनांच्या अंगी असणारी कलेला अपेक्षा असते - ______
  2. खाणीतून निघणारे - ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. योग्य जोड्या लावा. (2)

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) दागिने माचल
(ii) गुरु मागे फिरणे
(iii) चोर साडी
(iv) माघारी स्त्री
(v) नऊवारी शिष्य

 

       पण रत्नप्रभा क्षणभर विचलित झाली. ती म्हणाली, “मी नखशिखांत दागिन्यांनी मढून तुमच्या घरी येईन. असे वचन मी माझ्या गुरुजींना दिलं आहे आणि मी दिलेला शब्द नेहमीच पाळते.” पण मी माझ्या गुरुंना भेटून परत येताना हे सर्व दागिने तुम्हाला देईन.

       तिचं उत्तर ऐकून त्या चोराला फार आश्चर्य वाटलं. त्याने तिला जाऊ दिलं, पण तिच्यामागोमाग गुपचूप पाठलाग करत तोही निघाला. आता नक्की काय होणार, हे त्याला बघायचं होतं. रत्नप्रभा गुरुजींच्या घरी जाऊन पोहोचली. तिनं त्यांचा दरवाजा ठोकावला. गुरुजींनी दार उघडलं. दागिन्यांनी मढलेल्या रत्नप्रभेला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच, पण खेदही वाटला. ते म्हणाले, “मला वाटलं, तू माझं बोलणं विनोद समजून हसण्यावारी नेशील. तुला नाउमेद करण्यासाठी मी आपलं तसं म्हणालो. या एवढ्या संकटांना तोंड देऊन तू इथे येशील, असं मला मुळीच वाटलं नव्हतं. तू घरी जा, पोरी माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तू आपला शब्द पाळणारी स्त्री आहेस.”

       रत्नप्रभा माघारी फिरली, तेवढ्यात तो चोर तिच्यासमोर येऊन उभा राहिला. ती त्याला म्हणाली, “मी तुम्हाला हे सगळे दागिने द्यायचं कबूल केलं होतं ना? तुम्ही ते घ्या.”

       त्यावर तो चोर हसून म्हणाला, “तुमच्यासारखी स्त्री सापडणं विरळाच. मला तुमच्याकडून काहीसुद्धा नको. तुमच्यासारखी माणसं काही नेहमी भेटत नसतात.”

२. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)

  1. गुरुकडे जाणारी - ______
  2. रत्नप्रभाचा पाठलाग करणारा - ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. योग्य जोड्या लावा. (2)

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) चंदीपूर चेन्नई
(ii) अण्वस्त्र चाचण्या शिक्षणाची सोय
(iii) अण्णा युनिव्हर्सिटी ओरिसा
(iv) खेड्यापाड्यात जावेद मियाँदाद
(v) लहान पोरगा डॉ. कलाम

 

       त्या भेटीनंतर कधीही चेन्नईला जाण्याचा योग आला, की मी अण्णा युनिव्हर्सिटीत जाऊन त्यांची गाठ घेत असे. ते तेथे अध्यापन करत असत. आम्ही तेव्हा अनेक विषयांवर बोलत असू; परंतु आमच्या बोलण्याचा मुख्य विषय म्हणजे- खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाची सुविधा कशी पोहोचवायची, हाच असे. श्री. कलाम यांना आपल्या स्वतःच्या शिक्षकांविषयी नितांत आदर आहे, त्यांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी कमालीची कृतज्ञता आहे.

       मी एकदा ओरिसाच्या दौऱ्यावर गेले असताना चंदीपूरमध्ये जावेद मियाँदाद नावाच्या एखादा लहानशा कोळ्याच्या पोराकडून आयुष्यातील फार मोठं चिरंतन सत्य शिकले होते. जावेदने मला सांगितले होतं- ‘गंजून वाया जाण्यापेक्षा झिजून जाणं केव्हाही उत्तम.’ या अनुभवाविषयी मी कलाम यांना सांगत होते. कलाम यांनी त्याचे हे उद्गार ताबडतोब एका चिट्ठीवर लिहून घेतले आणि म्हणाले, “केवढा मोठा विचार हा!” ओरिसा हे त्यांचं अत्यंत आवडतं राज्य असल्याचं त्यांनीच मला सांगितलं, अण्वस्त्र चाचण्यांसाठी आयुष्यातील वीस वर्षे ते ओरिसातच राहिले होते.

       “तुम्ही जर ओरिसामध्ये कोणताही समाजकार्याचा उपक्रम हाती घेतलात, तर त्यासाठी मी जरूर येईन,” ते म्हणाले. तुम्ही तिथे बरचं काम करता आणि ओरिसा या राज्याविषयी तुम्हांलासुद्धा पुष्कळ आपुलकी आहे. याची मला कल्पना आहे.

२. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)

  1. ओरिसा, हे यांचे आवडते राज्य होते - ______
  2. लेखिकेला ओरिसा राज्याविषयी वाटणारी - ______

पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

जागा मंजूर झाल्याचं पत्र शासनाकडून मिळताच बाबा आपल्या काही कार्यकर्त्यांसह हेमलकशाला जाऊन धडकले. २३ डिसेंबर १९७३ यादिवशी त्यांनी तिथे मुक्काम ठोकला. याच दिवशी ‘लोक बिरादरी प्रकल्पा’च्या कामाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. वास्तविक मी चार-पाच महिन्यांनी येणार होतोच पण बाबा कुणासाठी थांबून राहणारे नव्हते. ‘तू तुझ्या वेळेला ये मी कामाला सुरुवात करतो’ असे म्हणून ते तिथे पोहोचले, पण बाबांची इच्छा, काम उभारण्याची ओढ याच्याशी सरकारी कारभाराचा मेळ कसा बसणार? त्यामुळे हा प्रकल्प उभा करण्याच्या कामात सुरुवातीलाच विघ्न निर्माण झालं.

हेमलकशाची जगा मूळ वनखात्याची होती. त्यांनी ती महसूलखात्याला दिली आणि महसूलखात्याने बाबांना म्हणजे ‘महारोगी सेवा समिती’ला दिली होती. ही जागा मिळाल्यामुळे नवा प्रकल्प उभारता येणार, या भावनेने बाबांना अगदी स्फूरण चढलं होतं. ज्या कार्यकर्त्याना घेऊन बाबा हेमलकशाला पोहोचले होते, त्यांच्या राहण्यासाठी वावरण्यासाठी जंगलातील काही जागा मोकळी करणं आवश्यक होतं. त्यामुळे बाबांनी तिथे जाऊन झाडं तोडायला सुरुवात केली. झाड तोडली जात आहेत हे कळताच तिथे वनाधिकारी आले आणि त्यांनी “तुम्ही बेकायदा आमच्या जागेत कसे घुसलात? असा आक्षेप घेणं सुरु केलं. बाबा म्हणाले, “कागदोपत्री जागा माझी आहे त्यावर ते म्हणाले,” पण त्यावरची झाडं ही आमची मालमत्ता आहे. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही” ते ऐकेनात, त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला.

खरं तर बाबा थेट हेमलकशाला गेले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, हे त्या वनाधिकाऱ्याला खटकलं होतं. आपल्याला त्यांनी आधी कल्पना द्यायला हवी होती, असं त्याला वाटत होतं. थोडक्यात, त्याला महत्व न दिल्याने तो चिडला होता. तेव्हा खोत नावाचे एक अधिकारी तिथे होते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढलां, “झाडं ही वनखात्याची संपत्ती आहे ना, मग त्याची किंमत तुम्ही त्यांच्याकडून वसूल करा” असं त्यांनी वनाधिकाऱ्याला सुचवलं. वनाधिकाऱ्याने ही सूचना स्वीकारली आणि तोडलेल्या झाडांची काही एक किमत ठरवली! तेवढी दिल्यानंतरच कुठे हे प्रकरण मिटलं.

(१) (2)

  1. २३ डिसेंबर १९७३
  2. वनाधिकाऱ्याचा आक्षेप

(२) खालील कृती करा. (2)

  1. बाबा आमटे यांनी आपली ‘महारोगी सेवा समिती’ या जागेवर सुरुवात केली - ______
  2. अधिकारी, ज्याने वनखात्याच्या अडचणीतून मार्ग काढला - ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) आकृतिबंध पूर्ण करा. (2)

          दारावर कुणी भिक्षा मागण्यास आला, तर आई त्याला भिक्षा घालत असे. एके दिवशी एक धडधाकट भिकारी आला असता रुक्मिणीबाई त्याला भिक्षा घालू लागल्या. विनोबा त्यांना म्हणाले, “हा तर धडधाकट दिसतो. अशा लोकांना जर भिक्षा देत गेलो, तर देशात आळस वाढेल. अपात्राला दान केले, तर त्यामुळे दान देणाऱ्याचेही अकल्याण होते.”

          रुक्मिणीबाईंनी ते शांतपणे ऐकले आणि म्हणाल्या, “विन्या, पात्र-अपात्र यांची परीक्षा करणारे आम्ही कोण? दारावर आलेला प्रत्येक माणूस परमेश्‍वररूप समजून त्याला शक्तिनुसार देत राहणे एवढे आपले काम आहे. त्याची परीक्षा करणारी मी कोण”? विनोबांनी त्यावर टिपणी केलीय, की ‘आईच्या या युक्तिवादावर विन्याला दुसरा, युक्तिवाद सुचला नाही.’

(2) जोड्या लावा. (2)

‘अ’ गट ‘ब’ गट
(i) दारावर भिक्षा मागायला येणारा  (1) रुक्मिणीबाई
(ii) भिकाऱ्याला भिक्षा घालणाऱ्या (2) विनोबा
(iii) आईच्या युक्तिवादावर टिपणी करणारे (3) भिक्षेकरी
(iv) मुलाचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेणाऱ्या (4) रुक्मिणीबाई

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) आकृतिबंध पूर्ण करा. (2)

             माणूस, त्याचा सामाजिक परिसर व त्याच्या सभोवतालचा निसर्ग यांतील संवाद शिक्षणामुळे साधता आला पाहिजे, हा कर्मवीरांचा आग्रह होता. भारत हा खेड्यांचा आणि खेडूतांचा देश आहे. खेडी ही निसर्गाला अधिक जवळची आहेत. व्यक्तिचे पौरुष, प्रतिकारक्षमता व उपक्रमशीलता यांचा विकास होतो तो माणूस आणि निसर्ग यांच्या सहयोगातून.

             कर्मवीरांनी हे जीवन रहस्य जाणले आणि शिक्षणाचा मोहरा खेड्याकडे वळविला. संस्थानिकांचे वाडे, वारकऱ्यांच्या धर्मशाळा, वाड्या आणि वस्त्यांवरची घरकुले हीच आपली आश्रयस्थाने समजून कार्याला आरंभ केला. पुढे-पुढे शाळांच्या वास्तू उभ्या राहिल्या. शक्य असेल तेथे शाळेला जोडून शेती संपादन करण्यात आली. शेतात विहिरी खोदण्यात आल्या. हे सर्व विदयार्थ्यांच्या श्रमदानातून घडवून आणले.

             अंगमेहनतच गरिबांची दौलत. ‘कमवा आणि शिका’ या शिक्षण-क्षेत्रातील मंत्राचे द्रष्टे कर्मवीर हेच होते.

(2) चौकटी पूर्ण करा. (2)

  1. कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत - ______
  2. कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र - ______

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) लेखिकेच्या मते पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे - (२)

(य) ______

(र) ______

           मी वेड्यासारखी समुद्र पाहत राहायची. कधी सकाळी तर कधी चांदण्यारात्री, पाण्यावर सांडलेलं चांदणं पाहिलं की वाटायचं सगळा समुद्र ओंजळीत पकडावा. कसं थंड, शांत वाटायचं. मनातले सगळे विकल्प लयाला गेले असायचे. अवघं अस्तित्व निरामय होऊन जायचं. आपण आणि हा अथांग पसरलेला समुद्र! बाकीची जाग-जाण मिटलेली असायची. अशी अभूतपूर्व शांतता मी पूर्वी कधी अनुभवलेली नव्हती. मुरुडच्या समुद्रानं मला बांधून ठेवलं. मी लिहायला लागले त्यामागे या मुरुडच्या समुद्राची फार मोठी प्रेरणा आहे. पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे महत्त्वाकांक्षा, यश आणि आत्मविश्वासाचं प्रतीक वाटायच्या, तर मागे मागे सरकणाऱ्या लाटा म्हणजे पराभव, अपयश, मानहानी पचवणारी शक्ती. समुद्राच्या पोटात किती काय काय दडलं असेल! त्यानं किती पचवलं असेल, किती सहन केलं असेल. माणसाच्या मनाचं मला ते दुसरं रूप वाटायचं, समुद्राशी माझा संवाद चालायचा.

- गिरिजा किर

(२) ‘पाण्यावर सांडलेलं चांदण पाहिलं’ की लेखिकेची होणारी भावावस्था - (२)

(य) ______

(र) ______


कमी वेळात, कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही कोणकोणती कामे करू शकता? त्यांची यादी करा.


खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

प्रचंड बुंधा असलेल्या मोहाच्या झाडाला पोखरी असतात. रिमझिम पावसात अडई व वणकी ही रानबदकं पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालतात. मोहरानातून तळ्याकडं उडत जाणाऱ्या येणाऱ्या रानबदकांचं दृश्य मोठं गूढ रम्य वाटतं.

माझं वनविभागात जाणं केवळ अपघात नव्हे. ते माझं भाग्य आहे, वनांच्या सावलीत मी वाढलोय. ग्रंथात आढळून येणार नाही असं ज्ञान मी जंगलातून प्राप्त केलंय. गुरुजनांकडून शिकता येणार नाही ते वृक्ष व दगडांनी पढविलयं. वृक्षांइतका धर्मात्मा कुणी नाही. त्यांच्यापासून मी देवाचं अस्तित्व जाणलयं. झाडं जशी सूर्यप्रकाश व दव शोषून घेतात तसं चांगलं तेवढं घेतलय. पानं गळतात. फुलं कोमेजतात. पण ती पुन्हा विकसित होतात. मितव्ययी म्हणजे काय ते जंगलापासून शिकावं. आभाळाच्या, पर्वताच्या, हिरव्या मैदानाच्या चमकणाऱ्या पाण्याच्या केवळ दर्शनानं कितीतरी स्मृती माझ्यात जागृत होतात. तुम्हाला वाटतं ना आपली. मुलं विचारी बनावीत, त्यांनी भावनांतील पावित्रय जाणाव, तर त्यांना जंगलात व पर्वतावर न्या.

(१) चौकटी पूर्ण करा -     (२)

रिमझिम पावसात अडई व वणकी या रानबदकांकडून होणाऱ्या कृती -

(य) ______

(र) ______

(२) कारणे लिहा -     (२)

आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे, कारण -

(य) ______

(र) ______


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रदधा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत.
  1. आकृतिबंध पूर्ण करा:           (2)
  2. टीप लिहा:         (2)
    स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम 

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×