Advertisements
Advertisements
Question
(अ) उतारा वाचून दिलेली कृती करा.
(१) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा.
(अ) वृक्ष बहरू लागले आहेत. ______
(आ) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे. ______
(२) स्पष्ट करा.
(अ) पाणी समजूतदार वाटते ______
(आ) पाणी क्रूर वाटते ______
|
वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताहेत. वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य, स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमळे, बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल? पण पाण्याचे मन कोण जाणणार? - राजा मंगळवेढेकर |
(आ) खालील आकृत्या पूर्ण करा.
| (१) | ![]() |
| (२) | ![]() |
(इ) तक्ता पूर्ण करा. खालील वाक्यांतील अव्यये ओळखा व त्यांचा प्रकार लिहा.
| वाक्य | अव्यय | अव्ययाचा प्रकार |
| (१) पाणी कुठे गच्चीवर लोळते. | ______, ______ | ______, ______ |
| (२) पाणी येते आणि जाते. | ______ | ______ |
- उताऱ्यातून कळलेला ‘पाण्याचा स्वभाव’ तुमच्या शब्दांत लिहा.
- वर्षाऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय काय करायला हवे, याबाबत तुमचे विचार लिहा.
Advertisements
Solution
(अ) (१)
(अ) वृक्ष बहरू लागले आहेत - वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे.
(आ) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे - करंगळीची सोंड झाली आहे.
(अ) (२)
(अ) पाणी समजूतदार वाटते, पाणी शांतपणे वाहते, तेव्हा ते जणू काही कोणतेही नुकसान होऊ नये, याची काळजीच घेत असावे असा भास होतो. म्हणून ते त्या वेळी समजूतदार वाटते.
(आ) पाणी क्रूर वाटते, नदीकाठावरच्या गरिबांच्या झोपडया उद्धवस्त करणाऱ्या पुराच्या पाण्याला पाहिल्यावर त्याच्या मनात त्या गरीब, दुबळ्या माणसांबद्दल कणवच नसावी, अशी भावना मनात जागी होते आणि ते पाणी स्वभावाने क्रूर असावे, असे वाटू लागते.
(आ)
| (१) |
वर्षाऋतूतील निसर्गाचे रूप :
|
| (२) |
पुढे वाहता वाहता पाण्याकडून होणाऱ्या विविध क्रिया :
|
(इ)
| वाक्य | अव्यय | अव्ययाचा प्रकार |
| (१) पाणी कुठे गच्चीवर लोळते. | कुठे, वर | क्रियाविशेषण व, शब्दयोगी अव्यये |
| (२) पाणी येते आणि जाते. | आणि | उभयान्वयी अव्यय |
- पावसाळ्यात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य असते. जिकडे तिकडे पाणीच पाणी असते. अधूनमधून पाऊस कोसळत असतो. त्यामुळे नदीनाल्यांतून पाणी ओसंडून वाहत असते. वाहताना ते कधी काठाला धडकते, तर कधी काठावर चढते. यावरून पाण्याचा धसमुसळेपणा जाणवतो. काही काही ठिकाणी ते इतके संथपणे वाहते कि वाटावे जणू काही ते आपला दरारा दाखवत आहे. मोठ्या पुलांखालून पाणी वाहत जाते, तेव्हा ते समजूतदार, शहाण्या मुलासारखे वाटते. कधी कधी ते काठावरच्या गरिबांच्या झोपडया उध्वस्त करते. अशा वेळी ते स्वभावाने खूप क्रूर असावे, असे मनात येते. कधी कधी ते झाडावर चढते, गच्चीवर लोळते, घाटाला बुडवते, वाटेला तुडवत. अशा वेळी त्याच्या स्वभावातला अवखळपणा जाणवत राहतो. असे पाण्याच्या स्वभावाचे अनेक पैलू या उताऱ्यातून जाणवत राहतात.
- आपल्याकडे अनेक ठिकाणी धो-धो पाऊस कोसळतो. पावसाचे सर्व पाणी समुद्रात वाहून जाते. पावसाचे हे वाहून जाणारे पाणी अडवून ठेवण्याचे व साठवून ठेवण्याचे काही उपाय आहेत. ते आपण अमलात आणले पाहिजेत. खूप महत्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे जमिनीच्या उतारावर आडवे चार खोदणे. त्या चरांमध्येच वाढणारी झाडे लावावीत. पाणी थबकत थबकत वाहत राहिल्यामुळे ते जमिनीत भरपूर मूरते. पाझर तलाव खोदल्यावरसुद्धा पाणी जमिनीत भरपूर मुरते. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे झाडे लावल्यास झाडांची मुले जमिनीत पाणी धरून ठेवतात. अशा उपायांनी जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. विहिरींमध्ये वर्षभर पाणी राहते. पाणी साठवण्यासाठी जमिनीत खड्डेसुद्धा खोदतात. या खड्ड्यांतील पाणी जमिनीत मुरून जाऊ नये म्हणून उपाययोजना करतात. त्यामुळे पावसाळ्यानंतर जवळपासच्या झाडझाडोऱ्याला व गुरांना पाणी देता येते. अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय योजून पाण्याची गरज भागवत येते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अपठित गद्य
प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कोण ते लिहा.
(i) रामेश्वरम बेटावरील इंग्रजी जाणणारा एकमेव माणूस - 
(ii) कलाम याना वाचनासाठी उत्तेजन देणारे - 
(iii) रामनाथपुरमला जाण्यासाठी वडिलांकडे परवानगी मागणारे - 
(iv) रामेश्वरम येथील वर्तमानपत्रlचे वितरक - 
जलालुद्दीन फारसा शिकला नाही पण त्याने अब्दुल कलामना मात्र शिकण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले. रामेश्वरम बेटावर इंग्रजी जाणणारा तो एकटाच माणूस होता. त्यानेच अब्दुल कलामना नवनव्या वैद्यानिक शोधांबद्दल, साहित्याबद्दल, आधुनिक उपचारपद्धतीबद्दल ओळख करून दिली. त्यांच्या गावात एस. टी. आर माणिकन् नावाचे एक माजी क्राांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह होता. त्यांनी कलाम याना पुस्तक वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. शमसुद्दीन नावाच्या दूरच्या भावाचा कलामवर प्रभाव होता. तो रामेश्वरममध्ये वर्तमानपत्राचा वितरक होता. रेल्वेने पंबन गावाहून वर्तमानपत्राचे गठ्ठे येत. पुढे शमसुद्दीन त्याचे वाटप करी. दिनमणी हे सर्वात लोकप्रिय तमीळ वृत्तपत्र होते. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध पेटल्यावर पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. चालत्या गाडीतून ते गठ्ठे फेकले जात. ते गोळा करण्याच्या कामात शमसुद्दीनला कलाम मदत करू लागला. अब्दुल कलामच्या आयुष्यातील ती पहिली कष्टाची कमाई! दुसरे महायुद्ध संपल्यावर रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी, रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी कलामांनी वडिलांकडे परवानगी मागितली. वडील म्हणाले, ‘‘अब्दुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिकण्यासाठी बाहेर जायला हवे.’’ शमसुद्दीन आणि जलालुद्दीन कलामबरोबर रामनाथपुरमला गेले. कलामने कलेक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. जलालुद्दीन म्हणाला, ‘‘मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच विचार आणत जा. त्यामुळे आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल.’’
(२) परिणाम लिहा.
(i) दुसरे महायुद्ध पेटले.
(ii) कलाम वृत्त पत्रे गोळा करण्या च्या कामात मदत करू लागले.
(३) विशेषण-विशेष्य यांच्या जोड्या जुळवा.

(४) स्वमत - पाठाच्या आधारे आशावादी विचारांचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)
आकलन कृती
१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)
- परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे.
- झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.
|
चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत. ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे. |
२. आकलन कृती
१. सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (०२)
- पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी ______
- हृदयाला आनंद बहाल करणारा ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
| संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वत:साठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे. |
1. योग्य जोड्या लावा. (2)
| 'अ' गट | 'ब' गट | |
| i. | सूर्य | पाणी |
| ii. | मेघ | वस्त्र |
| iii. | शेतकरी | प्रकाश |
| iv. | विणकर | धान्य |
2. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)
- आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला - ______
- आपले पोषण करणारी - ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) उत्तर लिहा. (२)
- ग्रंथपालांना काय संबोधले आहे?
- फुले म्हणजे निसर्गाची कोणती अभिव्यक्ती आहे असे लेखक म्हणतो?
|
पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते. नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य! या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात. |
२) पुढील आकृतिबंध पूर्ण करा. (२)
| ←नव्या पिढीला माणूसपणाच्या सुंदरतेकडे नेणारे→ |
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) एका वाक्यात उत्तरे लिहा. (२)
- परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे.
- झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.
|
चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाई तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत. ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे. |
२) सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (२)
- पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवा ______
- हृदयाला आनंद बहाल करणारा ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (२)
i. बहुतेकजण परस्परांमधल्या नात्याबाबत गंभीर नसतात. (१)
अ) कारण ते आधी दुसऱ्याचा विचार करतात नंतर स्वत:चा विचार करतात.
ब) कारण ते आधी स्वत:चा विचार करतात नंतर दुसऱ्याचा विचार करतात.
क) त्यांच्या दृष्टीने नातं ही एका अंतरावरली गोष्ट असते.
ड) त्यांच्या दृष्टीने नातं अवकाश देणारे असावे.
ii. आपल्या दृष्टीने नातं ही एक _____ (१)
अ) गुंतलेली गोष्ट असते.
ब) विखुरलेली गोष्ट असते.
क) अंतरावरील गोष्ट असते.
ड) आपल्यासाठी सोईची गोष्ट असते.
| दुसऱ्या माणसाशी असलेलं आपलं नातं ही खरंतर किती महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेकजण परस्परांमधील नात्याबाबत गंभीर नसतात, कारण ते आधी स्वत:चा विचार करतात आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतात. दुसरे आपल्यासाठी सोयीचे असतील, सुख देणारे असतील किंवा आपल्या विचारभावनांना अवकाश देणारे असतील, तरच आपण त्यांना विचारात घेतो. बर्याचदा आपल्य दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. आपण एखाद्याशी नात्यानं जोडलेले आहोत म्हणजे त्यांच्यात गुंतलेलो आहोत, पूर्णपणे सामावले आहोत असा अनुभव म्हणूनच आपल्याला येत नाही. खऱ्या नात्यामध्ये संवेदना विखुरलेली विभागलेली नसते, एकात्म असते. मात्र आपण नात्यात संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो. |
२) वैशिष्ट्ये लिहा. (२)
खऱ्या नात्यामधील संवेदना
- ______
- ______
- ______
- ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृती पूर्ण करा. (2)

|
सौजन्य हे सुजनांकडून अपेक्षावयाचे असते. ज्यांच्या मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता आहे, अशाजवळ सौजन्य असते. सौजन्याला नम्रतेची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळे होते. जगात वावरताना सौजन्यशील वृत्ती अंगी बाणलेली असली तर अनेक फायदे होऊ शकतात; पण त्याहीपेक्षा आपण माणुस आहोत, पशू नाही याची जी जाणीव होते तीच महत्त्वाची असते. ज्याची वृत्तीच आक्रमक असते आणि ज्यांचा स्वभाव जुळवून घेण्याचा नसतो, त्यांची वृत्ती ही स्वभावत: पशूची असते. त्यामुळे, त्यांच्याजवळ सौजन्य असेल कसे? सौजन्य ही मानसिक वृत्ती आहे. मनातून ती साकारते व कृतीतून प्रकट होते. व्यवहारात अशा वृत्तीतून जे वागणे होते किंवा आचार घडतो अशाच आचाराला सौजन्य म्हटले जाते. सौजन्यातून प्रेम व्यक्त होते. |
2. चौकटी पूर्ण करा. (2)
- सुजनांकडून अपेक्षित असलेले - ______
- सौजन्यातून व्यक्त होणारे - ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. योग्य जोड्या लावा. (2)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | |
| (i) | शेती | प्रकाश |
| (ii) | सूर्य | वस्त्र |
| (iii) | वृक्ष | हंगाम |
| (iv) | पैठणी | ओंबी |
| (v) | भात | पाने |
| शेतीभातीचे ते दिवस व कापणीचा हंगाम, अगोदरच त्या गावाला झाडी अतोनात, तशात प्रातःकाळचा तो वेळ, सूर्य नुकताच वर आला होताच त्याचे कोवळे ऊन पावसाने आपल्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून टवटवीत केलेल्या वृक्षांची हिरवीगार पाने अधिक सतेज दिसत होती. सभोवार कणसांवर आलेली विस्तीर्ण शेतेच दृष्टीस पडत होती. आमच्या पायांपासून तो थेट समोरच्या डोंगरापर्यंत पिवळसर हिरव्या रंगाचे गालिचेच पसरले आहेत की काय असा भास होई. मधून-मधून नाचण्यांची हिरवीगार शेत दिसत, त्यामुळे असा भास होई की, सृष्टिदेवी हिरव्या बुट्टयांनी युक्त अशी पिवळी पैठणीच नेसून विहार करीत आहे. आत दाणा झाल्याकारणाने शेतातील भाताच्या ओंब्या अगदी वाकून गेल्या होत्या. नाना तऱ्हेचे व चित्रविचित्र रंगांचे पक्षी मंजूळ गायन करीत इकडून-तिकडे उडून जाताना दृष्टीस पडत आणि शेतामधून काम करणारी माणसेही मधून-मधून दिसत, शीतल व सुवासिक फुलांच्या वासाने सुगंधित असा वारा झुळझुळ वाहत होता. तो शेतावरून वाहताना समुद्रावर वर खाली होणाऱ्या लाटांप्रमाणे त्या शेतांची शोभा दिसत होती. वारा लागून त्या ओंब्याचा जो सळसळ आवाज होई तो किती मनोहर! |
२. एका शब्दात उत्तेर लिहा. (2)
- पायापासून डोंगरापर्यंत पसरलेले पिवळसर हिरव्या रंगाचे - ______
- मंजूळ गायन करणारे - ______
(१) उतारा वाचून त्यावरील कृती करा.
(अ) वैशिष्ट्ये लिहा.

| विद्वत्ता कोणाकडेही असो ती क्षणात मिळवता येणारी बाब नाही. ज्याप्रमाणे झाडाची मुळे एकदम खोल-खोल जाऊ शकत नाहीत, त्यासाठी महिने-वर्षे लागतात; परंतु जेवढी खोल मुळे असतात, तेवढा त्या झाडाचा पाया भक्कम असतो. तसेच विद्वत्तेचेही आहे. जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्त्व असेल. आपल्याला एकदाच विजेसारखे चमकायचे, की सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे, हे ठरवायचे आहे. विद्वत्ता ही अशी बाब आहे, जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. बरे, तिला कोणी तुमच्याकडून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही; पण एकदा ती तुमच्याजवळ आली, की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते, सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. थोडक्यात, विद्वत्ता तुम्हांला सर्व मिळवून देते, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते. |
(आ) खालील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम लिहा.
| घटना/कृती | परिणाम |
| (१) झाडाची मुळे खोल जाणे. | (१) ____________ |
| (२) प्रयत्नांनी विद्या मिळवणे. | (२) ____________ |
(इ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
(१) विजेसारखे चमकणे -
(२) सूर्यासारखे प्रकाशणे -
(२) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.
(१) संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशाने दिपून जाईल.
(३) व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात ते स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. योग्य जोड्या लावा. (2)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | |
| (i) | चंदीपूर | चेन्नई |
| (ii) | अण्वस्त्र चाचण्या | शिक्षणाची सोय |
| (iii) | अण्णा युनिव्हर्सिटी | ओरिसा |
| (iv) | खेड्यापाड्यात | जावेद मियाँदाद |
| (v) | लहान पोरगा | डॉ. कलाम |
|
त्या भेटीनंतर कधीही चेन्नईला जाण्याचा योग आला, की मी अण्णा युनिव्हर्सिटीत जाऊन त्यांची गाठ घेत असे. ते तेथे अध्यापन करत असत. आम्ही तेव्हा अनेक विषयांवर बोलत असू; परंतु आमच्या बोलण्याचा मुख्य विषय म्हणजे- खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाची सुविधा कशी पोहोचवायची, हाच असे. श्री. कलाम यांना आपल्या स्वतःच्या शिक्षकांविषयी नितांत आदर आहे, त्यांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी कमालीची कृतज्ञता आहे. मी एकदा ओरिसाच्या दौऱ्यावर गेले असताना चंदीपूरमध्ये जावेद मियाँदाद नावाच्या एखादा लहानशा कोळ्याच्या पोराकडून आयुष्यातील फार मोठं चिरंतन सत्य शिकले होते. जावेदने मला सांगितले होतं- ‘गंजून वाया जाण्यापेक्षा झिजून जाणं केव्हाही उत्तम.’ या अनुभवाविषयी मी कलाम यांना सांगत होते. कलाम यांनी त्याचे हे उद्गार ताबडतोब एका चिट्ठीवर लिहून घेतले आणि म्हणाले, “केवढा मोठा विचार हा!” ओरिसा हे त्यांचं अत्यंत आवडतं राज्य असल्याचं त्यांनीच मला सांगितलं, अण्वस्त्र चाचण्यांसाठी आयुष्यातील वीस वर्षे ते ओरिसातच राहिले होते. “तुम्ही जर ओरिसामध्ये कोणताही समाजकार्याचा उपक्रम हाती घेतलात, तर त्यासाठी मी जरूर येईन,” ते म्हणाले. तुम्ही तिथे बरचं काम करता आणि ओरिसा या राज्याविषयी तुम्हांलासुद्धा पुष्कळ आपुलकी आहे. याची मला कल्पना आहे. |
२. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)
- ओरिसा, हे यांचे आवडते राज्य होते - ______
- लेखिकेला ओरिसा राज्याविषयी वाटणारी - ______
पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
|
जागा मंजूर झाल्याचं पत्र शासनाकडून मिळताच बाबा आपल्या काही कार्यकर्त्यांसह हेमलकशाला जाऊन धडकले. २३ डिसेंबर १९७३ यादिवशी त्यांनी तिथे मुक्काम ठोकला. याच दिवशी ‘लोक बिरादरी प्रकल्पा’च्या कामाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. वास्तविक मी चार-पाच महिन्यांनी येणार होतोच पण बाबा कुणासाठी थांबून राहणारे नव्हते. ‘तू तुझ्या वेळेला ये मी कामाला सुरुवात करतो’ असे म्हणून ते तिथे पोहोचले, पण बाबांची इच्छा, काम उभारण्याची ओढ याच्याशी सरकारी कारभाराचा मेळ कसा बसणार? त्यामुळे हा प्रकल्प उभा करण्याच्या कामात सुरुवातीलाच विघ्न निर्माण झालं. हेमलकशाची जगा मूळ वनखात्याची होती. त्यांनी ती महसूलखात्याला दिली आणि महसूलखात्याने बाबांना म्हणजे ‘महारोगी सेवा समिती’ला दिली होती. ही जागा मिळाल्यामुळे नवा प्रकल्प उभारता येणार, या भावनेने बाबांना अगदी स्फूरण चढलं होतं. ज्या कार्यकर्त्याना घेऊन बाबा हेमलकशाला पोहोचले होते, त्यांच्या राहण्यासाठी वावरण्यासाठी जंगलातील काही जागा मोकळी करणं आवश्यक होतं. त्यामुळे बाबांनी तिथे जाऊन झाडं तोडायला सुरुवात केली. झाड तोडली जात आहेत हे कळताच तिथे वनाधिकारी आले आणि त्यांनी “तुम्ही बेकायदा आमच्या जागेत कसे घुसलात? असा आक्षेप घेणं सुरु केलं. बाबा म्हणाले, “कागदोपत्री जागा माझी आहे त्यावर ते म्हणाले,” पण त्यावरची झाडं ही आमची मालमत्ता आहे. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही” ते ऐकेनात, त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला. खरं तर बाबा थेट हेमलकशाला गेले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, हे त्या वनाधिकाऱ्याला खटकलं होतं. आपल्याला त्यांनी आधी कल्पना द्यायला हवी होती, असं त्याला वाटत होतं. थोडक्यात, त्याला महत्व न दिल्याने तो चिडला होता. तेव्हा खोत नावाचे एक अधिकारी तिथे होते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढलां, “झाडं ही वनखात्याची संपत्ती आहे ना, मग त्याची किंमत तुम्ही त्यांच्याकडून वसूल करा” असं त्यांनी वनाधिकाऱ्याला सुचवलं. वनाधिकाऱ्याने ही सूचना स्वीकारली आणि तोडलेल्या झाडांची काही एक किमत ठरवली! तेवढी दिल्यानंतरच कुठे हे प्रकरण मिटलं. |
(१) (2)
- २३ डिसेंबर १९७३
- वनाधिकाऱ्याचा आक्षेप
(२) खालील कृती करा. (2)
- बाबा आमटे यांनी आपली ‘महारोगी सेवा समिती’ या जागेवर सुरुवात केली - ______
- अधिकारी, ज्याने वनखात्याच्या अडचणीतून मार्ग काढला - ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) आकृतिबंध पूर्ण करा. (2)

|
दारावर कुणी भिक्षा मागण्यास आला, तर आई त्याला भिक्षा घालत असे. एके दिवशी एक धडधाकट भिकारी आला असता रुक्मिणीबाई त्याला भिक्षा घालू लागल्या. विनोबा त्यांना म्हणाले, “हा तर धडधाकट दिसतो. अशा लोकांना जर भिक्षा देत गेलो, तर देशात आळस वाढेल. अपात्राला दान केले, तर त्यामुळे दान देणाऱ्याचेही अकल्याण होते.” रुक्मिणीबाईंनी ते शांतपणे ऐकले आणि म्हणाल्या, “विन्या, पात्र-अपात्र यांची परीक्षा करणारे आम्ही कोण? दारावर आलेला प्रत्येक माणूस परमेश्वररूप समजून त्याला शक्तिनुसार देत राहणे एवढे आपले काम आहे. त्याची परीक्षा करणारी मी कोण”? विनोबांनी त्यावर टिपणी केलीय, की ‘आईच्या या युक्तिवादावर विन्याला दुसरा, युक्तिवाद सुचला नाही.’ |
(2) जोड्या लावा. (2)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (i) दारावर भिक्षा मागायला येणारा | (1) रुक्मिणीबाई |
| (ii) भिकाऱ्याला भिक्षा घालणाऱ्या | (2) विनोबा |
| (iii) आईच्या युक्तिवादावर टिपणी करणारे | (3) भिक्षेकरी |
| (iv) मुलाचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेणाऱ्या | (4) रुक्मिणीबाई |
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) लेखिकेच्या मते पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे - (२)
(य) ______
(र) ______
|
मी वेड्यासारखी समुद्र पाहत राहायची. कधी सकाळी तर कधी चांदण्यारात्री, पाण्यावर सांडलेलं चांदणं पाहिलं की वाटायचं सगळा समुद्र ओंजळीत पकडावा. कसं थंड, शांत वाटायचं. मनातले सगळे विकल्प लयाला गेले असायचे. अवघं अस्तित्व निरामय होऊन जायचं. आपण आणि हा अथांग पसरलेला समुद्र! बाकीची जाग-जाण मिटलेली असायची. अशी अभूतपूर्व शांतता मी पूर्वी कधी अनुभवलेली नव्हती. मुरुडच्या समुद्रानं मला बांधून ठेवलं. मी लिहायला लागले त्यामागे या मुरुडच्या समुद्राची फार मोठी प्रेरणा आहे. पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे महत्त्वाकांक्षा, यश आणि आत्मविश्वासाचं प्रतीक वाटायच्या, तर मागे मागे सरकणाऱ्या लाटा म्हणजे पराभव, अपयश, मानहानी पचवणारी शक्ती. समुद्राच्या पोटात किती काय काय दडलं असेल! त्यानं किती पचवलं असेल, किती सहन केलं असेल. माणसाच्या मनाचं मला ते दुसरं रूप वाटायचं, समुद्राशी माझा संवाद चालायचा. - गिरिजा किर |
(२) ‘पाण्यावर सांडलेलं चांदण पाहिलं’ की लेखिकेची होणारी भावावस्था - (२)
(य) ______
(र) ______
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नानातऱ्हांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते-हत्यारे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोदू लागला; शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला. |
माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उताऱ्याच्या आधारे व तुमच्या मते स्पष्ट करा.
कमी वेळात, कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही कोणकोणती कामे करू शकता? त्यांची यादी करा.


