English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.गिरणी कामगार संपावर गेले. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
गिरणी कामगार संपावर गेले.

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकवर्गाशी वाटाघाटी करून, कामगार वर्गाला विश्वासात न घेता ८ ते १७% वर तडजोड केली. बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली.
  2. काही कामगार डॉ.दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांनी डॉ. दत्ता सामंत यांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. ६५ गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचे नेतृत्व करू लागले. १८ जानेवारी १९८२ रोजी मुंबईत अडीच लाख कामगार संपावर गेले. त्यामुळे गिरणी कामगार तब्बल ६ महिने ते १ वर्ष संपावर गेले.
  3. महाराष्ट्र सरकारने ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली. मात्र, सरकारने या कामगारांशी बोलणी करण्यास नकार दिला.
  4. नंतर केंद्र सरकारने 13 कापड गिरण्यांचे राष्ट्रीयीकरण केले. समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले गेले पण तो प्रयत्‍न यशस्वी झाला नाही.
shaalaa.com
कामगार समस्या
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.04: आर्थिक विकास - स्वाध्याय [Page 22]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.04 आर्थिक विकास
स्वाध्याय | Q 3. (३) | Page 22
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×