English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांवर समाज उभारणी केली. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांवर समाज उभारणी केली.

Explain
Advertisements

Solution

  1. जातीसंस्थेला विरोध आणि समतेला प्राधान्य देणारा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारला.
  2. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेबांनी समाजाला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश दिला.
  3. पुढे महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली.
  4. त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले.
  5. नाशिकच्या काळाराम मंदिरात सर्वांना मुक्त प्रवेश मिळावा यासाठी १९३० मध्ये सत्याग्रह सुरू केला.

अशा रितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांवर आधारित अशी समाज उभारणी करण्याचे कार्य केले.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×