English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी बारदेशावर स्वारी केली. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बारदेशावर स्वारी केली.

Explain
Advertisements

Solution

  1. गोव्याच्या उत्तरेच्या प्रदेशास ‘बारदेश’ असे म्हणत असत. गोवा आणि बारदेश प्रदेशावर पोर्तुगिजांची सत्ता होती.
  2. १६६५ मध्ये मराठ्यांचे आरमार कर्नाटकच्या सागरकिनाऱ्याच्या प्रदेशातून जात असताना पोर्तुगिजांनी मराठ्यांची तेरा जहाजे पळवून नेली. पुढे त्यांना ती मराठ्यांच्या धाकामुळे सोडून द्यावी लागली.
  3. १६६६ मध्ये मराठ्यांनी आदिलशाहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला असता पोर्तुगिजांनी तेथील किल्लेदाराला दारूगोळा पुरवला.
  4. शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगिजांनी दाभोळ येथे वखार उघडली.
  5. पोर्तुगिजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले म्हणून स्थानिक लोक असंतुष्ट होते.

यामुळेच इ.स.१६६७ मध्ये शिवरायांनी बारदेशावर स्वारी केली.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×