Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बारदेशावर स्वारी केली.
Explain
Advertisements
Solution
- गोव्याच्या उत्तरेच्या प्रदेशास ‘बारदेश’ असे म्हणत असत. गोवा आणि बारदेश प्रदेशावर पोर्तुगिजांची सत्ता होती.
- १६६५ मध्ये मराठ्यांचे आरमार कर्नाटकच्या सागरकिनाऱ्याच्या प्रदेशातून जात असताना पोर्तुगिजांनी मराठ्यांची तेरा जहाजे पळवून नेली. पुढे त्यांना ती मराठ्यांच्या धाकामुळे सोडून द्यावी लागली.
- १६६६ मध्ये मराठ्यांनी आदिलशाहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला असता पोर्तुगिजांनी तेथील किल्लेदाराला दारूगोळा पुरवला.
- शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगिजांनी दाभोळ येथे वखार उघडली.
- पोर्तुगिजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले म्हणून स्थानिक लोक असंतुष्ट होते.
यामुळेच इ.स.१६६७ मध्ये शिवरायांनी बारदेशावर स्वारी केली.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
