Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बारदेशावर स्वारी केली.
Explain
Give Reasons
Advertisements
Solution
- बारदेश प्रदेश म्हणजे गोव्याच्या उत्तरेचा भाग होय आणि त्यावर पोर्तुगीज सत्ता होती.
- छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रबळ मराठा आरमार उभारल्यामुळे पोर्तुगीज सावध झाले. लवकरच मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणले.
- कर्नाटकच्या सागरकिनाऱ्याच्या प्रदेशातून जात असताना पोर्तुगिजांनी मराठ्यांची तेरा जहाजे पळवून नेली. पुढे त्यांना ती मराठ्यांच्या धाकामुळे सोडून द्यावी लागली.
- १६६६ मध्ये मराठ्यांनी आदिलशाहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला असता पोर्तुगिजांनी तेथील किल्लेदाराला दारूगोळा पुरवला.
- शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगिजांनी दाभोळ येथे वखार उघडली.
- पोर्तुगिजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले म्हणून स्थानिक लोक असंतुष्ट होते.
त्यामुळे, इ.स.१६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बारदेश प्रांतावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
