English

पुढील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा: ब्रिटिश भारतात आल्यापासून भारतातील शिक्षण धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे आहे. याचा अर्थ असा की, अभ्यासाच्या विषयामध्ये पवित्र - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

ब्रिटिश भारतात आल्यापासून भारतातील शिक्षण धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे आहे. याचा अर्थ असा की, अभ्यासाच्या विषयामध्ये पवित्र धार्मिक ग्रंथांचा समावेश नव्हता. समाजात ऊर्ध्व गतिशीलतेसाठी शिक्षण आवश्यक असते. ब्रिटिशांच्या आगमनापासून शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली. कुणालाही इंग्रजी भाषा शिकता येणार होती आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची संधीही सर्वांसाठी खुली करण्यात आली.

विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरांतील भारतीयांनी इंग्रजीतून शिक्षण घेण्याची ही पहिलीच वेळ होती. यातूनच नंतर भारतातील बुद्धिजीवी वर्ग आकारास आला. त्यांना आपण समाजसुधारक म्हणून ओळखतो. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे हे समाजसुधारक आपल्या परिचयाचे आहेत. त्यांनी भारतीय समाजात धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा घडवून आणल्या.

स्वातंत्र्योत्तर काळानंतर वर्तमानातदेखील असे द्रष्टे सुधारक समाजात आहेत.

स्वातंत्र्यप्राप्तीला ७३ वर्षे झाल्यानंतर आता शिक्षणाच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत, परंतु आपण केवळ शिक्षित झालो आहोत की, त्या शिक्षणामुळे नागरिकांना रोजगारही मिळाला आहे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. समाजात सूक्ष्म पातळीवर बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणाने आपले प्रबोधन केले आहे का? हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न आहे.

शासनाने समाजातील प्रत्येक स्तराच्या हिताचा विचार करणे गरजेचे आहे. समाजातील सर्वांच्या कल्याणासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

  1. ब्रिटिश काळात भारतीय शिक्षणात कोणते बदल घडून आले?
  2. शिक्षणामुळे भारतीय समाजात खरोखर बदल झाले आहेत का?
Very Long Answer
Advertisements

Solution

  1. ब्रिटिश सरकारच्या नवीन उदारमतवादी शिक्षण धोरणांतर्गत, शिक्षण हे समाजाच्या केवळ विशिष्ट घटकांपुरते मर्यादित राहिले नाही. धर्मनिरपेक्ष शिक्षणाच्या प्रसाराने भारतीयांची दृष्टी अधिक व्यापक केली. सुशिक्षित भारतीयांवर पाश्चात्य आदर्शांचा प्रभाव पडला. समाजातील अनेक परंपरा आणि रूढी अन्यायकारक व अनुचित आहेत, ही बाब त्यांनी मान्य केली. भारतीय समाजात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने, त्यांनी अनेक सामाजिक आणि धार्मिक चळवळी सुरू केल्या.
  2. वैयक्तिक किंवा सूक्ष्म स्तरावर बदल घडवून आणण्यात शिक्षणाची भूमिका अत्यंत उपयुक्त असते. आजच्या काळात, शिक्षण हे सामाजिक विकास आणि परिवर्तनाचे एक माध्यम किंवा साधन ठरू शकते, ही बाब सर्वमान्य झाली आहे. लोकांचे दृष्टिकोन आणि मनोवृत्ती बदलून, सामाजिक परिवर्तनाची नांदी करण्याची शक्ती शिक्षणात असते. सामाजिक संबंधांची रचना बदलून, शिक्षण सामाजिक परिवर्तनास कारणीभूत ठरू शकते. शिक्षणाच्या प्रभावामुळे मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू आमूलाग्र बदलला आहे. शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे, जी सामाजिक वर्तणुकीत सुधारणा घडवून आणते. ही एक अशी कार्यपद्धती आहे, जी प्रत्येक व्यक्तीला समाजाच्या प्रगतीमध्ये सकारात्मक योगदान देण्यास आणि समाजाच्या विविध उपक्रमांमध्ये प्रभावीपणे सहभागी होण्यास सक्षम बनवते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×