Advertisements
Advertisements
Question
‘निरंजनच खरा नागरिक’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Advertisements
Solution
निरंजन हा एक हुशार आणि जबाबदार मुलगा आहे. त्याच्या या गुणांचे दर्शन पाठात घडतेच; पण त्याच्यातल्या खऱ्या नागरिकाची ओळख होते, ती रेल्वेच्या घटनेतून. पुलावरचे रूळ खराब झाल्यामुळे रेल्वे अपघाताचा भयंकर धोका त्याने ओळखला. खराब रुळांमुळे अपघात झाल्यास शेकडो लोकांचा जीव धोक्यात येईल हे त्याने ओळखले आणि स्वत:चा नागरिकशास्त्राचा पेपर बुडवूनही त्याने स्टेशनमास्तरांना खबर दिली. या कृतीमुळे आपला पेपर बुडेल, गुरुजींनी दिलेल्या सवलती जातील, हे माहीत असूनही, लोकांचा जीव वाचवण्याकरता स्वत:चे नुकसान सोसण्याची तयारी त्याने दाखवली. त्यामुळे, एक मोठा अनर्थ टळला. नागरिकशास्त्र हा विषय आपल्याला जे शिकवतो ते त्याने प्रत्यक्षात आयुष्यात करून दाखवले. त्यामुळे, 'निरंजन एक खरा नागरिक' असल्याचे स्पष्ट होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

खालील घटनांचे परिणाम लिहा.
| घटना | परिणाम |
| (१) निरंजनच्या आई-वडिलांचे निधन | |
| (२) निरंजनचा परीक्षेत पहिला नंबर यायचा. |
निरंजनची दिनचर्या लिहा.
| निरंजनची दिनचर्या |
| ↓ |
| _________________________ |
| ↓ |
| _________________________ |
| ↓ |
| _________________________ |
| ↓ |
| _________________________ |
| ↓ |
| _________________________ |
निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारे वाक्य शोधा.
स्वप्नाळू-
निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारे वाक्य शोधा.
तार्किक विचार करणारा-
निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारे वाक्य शोधा.
संवेदनशील-
तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. चौकट पूर्ण करा. (०२)

|
मामा गेला तो पुन्हा परतला नाही; मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरामोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा, मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर रहायचा. सकाळी लवकर उठून घरातली, गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. त्याच्या वह्या-पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला सांगितलं, की 'जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे, तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन. नाहीतर नाही.' गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खूश होता. नागरिकांची कर्तव्ये कोणती? उत्तम नागरिक कुणाला म्हणावे? लोकसभा म्हणजे काय? ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती. अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक. निरंजन ताडकन उठून उभा राहिला. नऊ वाजून गेले होते. साडेदहाची परीक्षा. त्याआधी देशमुखांकडे जायचं होतं. केवढंतरी लांब चालायचं होतं. भराभर आवरून तो निघाला. |
२.आकलन कृती
कारण लिहा. (०२)
- निरंजन वार लावून जेवायचा, कारण -______
- निरंजन मनातल्या मनात उजळणी करत होता, कारण - ______
३. स्वमत (०३)
हक्काचे घर नसले की इतरत्र राहताना लहानपणीच परिस्थितीशी जुळवून घ्यायला मुले शिकतात. तुमचे मत स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. शब्दजाल पूर्ण करा. (०२)
१. ______
२. ______ स्टेशनवर गेल्याने निरंजनचे होणारे नुकसान
३. ______
४. ______
| मावशीचं घर गावाबाहेर डोंगरपायथ्याशी. मध्ये एक नदीही लागायची. पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत चालत पार करायला लागायची; परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवली होती. या पुलामुळं आता जाणं-येणं सोपं झालं होतं. निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत झपाझप चालला होता. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला. त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येई. तुम्ही विसरलात; पण दुसरा ठेचकाळून जिवाला मुकतो त्याचं काय! असंच त्याचं म्हणणं. निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा साडेनऊ वाजून गेले असावेत. आता नऊ पन्नासची गाडी येईल. धाड्धाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल. ही कोकण गाडी किती छान दिसते; पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला? आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू, या विचाराने तो हुरळून गेला. तोच त्याचं लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेलं. हे छिद्र कसलं? रोज नसतं बुवा, असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं तो कुणीतरी काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं. निरंजनला आश्चर्यच वाटलं. |
२. आकलन कृती
१. चूक की बरोबर ते लिहा. (०१)
- मावशीचे घर गावाबाहेर होतं.
- निरंजन स्टेशनबाहेर पोहोचला तेव्हा दहा वाजले होते.
२. चौकट पूर्ण करा. (०१)
निरंजन सावध होताच या गोष्टी विसरला -
१ ______ २ ______
३. स्वमत (०३)
आपण जे शिकलो ते आपण आचरणात आणले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणता येईल, तुमचे मत स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१.
१. उताऱ्याच्या आधारे पाच हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. (०१)
२. कोष्टक पूर्ण करा. (०१)

|
रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली नऊ पंन्नासची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल, हे त्याच्या लक्षात आलं. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देखमुखांकडचं जेवण सारं विसरला. त्याच्या डोळयांसमोर धाड्धाड् आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. कानठळया बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळया कानांत घुमू लागल्या. स्टेशन इथून खूप दूर होतं. तीन-चार किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास. भडसावळे गुरुजींची मदत बंद. शिक्षणही बंद. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं; परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती. आता पाच मिनिटांतच ती सुटणार होती. निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशनमास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली. |
२. आकलन कृती
१. घटनाक्रम लावा. (०२)
१. निरंजनने धावतच स्टेशन मास्तरांना गाठलं.
२. निरंजनने आर्जवं केली.
३. पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं.
४. नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती.
३. स्वमत (०३)
कधी कधी छोटी मुलेही समाजोपयोगी असे मोठे काम करतात. तुमचे विचार स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. आकृती पूर्ण करा. (०२)
अ)

ब)

|
फारच भयंकर! कल्पना करता येणार नाही, असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तत्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं; परंतु त्या वेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळया सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला. |
२. आकलन कृती
१. कृती पूर्ण करा. (०२)
i. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ त्या ठिकाणी जमा झालेले -
१. ______ २. ______ ३.______ ४. ______
ii. उदास मनाने घरी परतणारा - ______
३. स्वमत (०३)
कधी कधी दुसऱ्याचे भले होण्यासाठी आपल्याला काही नुकसान सहन करावे लागते. आपले मत व्यक्त करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) कोण, ते लिहा: (2)
- निरंजनचा सर्व खर्च करणारे -
- निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परतलेला -
| मामा गेला तो पुन्हा परतला नाही मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरामोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा, मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. सकाळी लवकर उठून घरातली, गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. त्याच्या वह्या-पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला सांगितलं, की ‘जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे, तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन. नाहीतर नाही.’ गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खूश होता. |
(2) का ते लिहा: (2)
- निरंजन वार लावून जेवायचा, कारण ______
- निरंजन झटून अभ्यास करायचा, कारण ______
(3) तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा. (3)
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. कोण ते लिहा. (2)
- स्टेशनमास्तरांकडे धाव घेणारा - ______
- गाडी दीर्घकाळ थांबविण्याचा आदेश देणारे - ______
|
निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशनमास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली. फारच भयंकर! कल्पना करता येणार नाही, असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं; परंतु त्या वेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला. |
२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)
निरंजनने त्याक्षणी घेतलेल्या निर्णयाबाबत तुमचे मत लिहा.

