Advertisements
Advertisements
Question
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
Advertisements
Solution
- कवी - ज. वि. पवार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन करणे व त्यांना विनम्र अभिवादन करणे हा या कवितेचा विषय आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारली. समतेवर आधारित नव्या समाजाची पायाभरणी केली. त्यांच्या या कार्याचा गौरव प्रस्तुत कवितेत केला गेला आहे. त्या काळातील प्रतिकूल परिस्थितीचे दर्शन कवी येथे घडवतात. मूकनायक, बहिष्कृत भारत, पाठ फिरवणारी सूर्यफुले, काठ्या, संगिनी अशा समर्पक प्रतिमा-प्रतीकांचा वापर करून नेमक्या शब्दांत चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे वर्णन कवी येथे करतात. या कवितेद्वारे आंबेडकरांचे कार्य प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचते. आजही समाजाला अशा विद्वान, कर्तबगार नेतृत्वाची असणारी गरज येथे ठळकपणे मांडली आहे. ती मनाला भिडते, म्हणून प्रस्तुत कविता मला फार आवडते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______.
आकृती पूर्ण करा.

कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा.
| कवितेतील संदर्भ | स्पष्टीकरण |
| (१) मळवाट | (अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज |
| (२) खाचखळगे | (आ) पारंपरिक वाट |
| (३) मूक समाज | (इ) अडचणी, कठीण परिस्थिती |
चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.
चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा.
| पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती | पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती |
| ____________ | ____________ |
| ____________ | ____________ |
| ____________ | ____________ |
‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून (तू झालास मूक समाजाचा नायक) जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृत्या पूर्ण करा. (२)
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ___________
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करणारे - ___________
2. सत्य विधान ओळखा. (२)
- बाबासाहेब निघाले तेव्हा सूर्यफुलांनी त्यांचे स्वागत केले.
- बाबासाहेब बोलक्या जिवांचे नायक झाले.
- चवदार तळ्यावर बाबासाहेबांनी गुलामांच्या पायात बेड्या चढवल्या.
- विषम परिस्थितीवर स्वार होत बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला.
|
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू झालास परिस्थितीवर स्वार तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तुझे शब्द जसे की आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय |
3. ओळींचा सरळ अर्थ लिहा. (२)
'तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत' या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
4. विचार साैंदर्य लिहा. (२)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
'तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.'
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
|
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू झालास परिस्थितीवर स्वार तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तुझे शब्द जसे की आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय |
1. असत्य विधान ओळखा. (२)
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांना महाकाव्याइतके महत्त्व प्राप्त झाले.
- पन्नास वर्षांनंतरही सूर्यफुले काळोखाच्या प्रदेशाचा ध्यास घेत उभी आहेत.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाकडे पाहून साध्या काठ्यांच्याही संगिनी झाल्या.
- चवदार तळ्याच्या सत्याग्रहात जनमानस पेटून उठले होते.
2. खालील आकृती पूर्ण करा. (२)

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायेत,
बिगूल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय.
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. चौकटी पूर्ण करा: (2)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______
|
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू झालास परिस्थितीवर स्वार तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तुझे शब्द जसे की आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय |
2. आकृतिबंध पूर्ण करा: (2)

3. खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा: (2)
तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
4. काव्यसौंदर्यः (2)
‘आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.’
या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
