English

अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.

Short/Brief Note
Advertisements

Solution

अतिशय कठीण परिस्थिती मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. ते उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी आपल्या अगाघ ज्ञानाच्या बळावर इथल्या बहिष्कृत समाजाला अन्यायापासून मुक्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य अंगिकारले. शोषित, पीडित व वर्णव्यवस्थेतून नाकारलेल्या, समृद्धीपासून वंचित असलेल्या जनतेला संघटित केले. त्यांनी 'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा' हा मूलमंत्र देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला. अन्यायाविरुद्ध लढा देण्यास प्रवृत्त केले. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. समाजाला बोधितत्त्वाची शिकवण देऊन बौद्ध धर्म स्वीकारला. स्वतंत्र भारताचे संविधान लिहून भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी 'भारतरत्न' हा सर्वोच्च बहुमान सन्मानाने बहाल करण्यात आला.

shaalaa.com
तू झालास मूक समाजाचा नायक
  Is there an error in this question or solution?
Chapter 19: तू झालास मूक समाजाचा नायक - कृती [Page 81]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक
कृती | Q (५) (ई) | Page 81

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______ 


आकृती पूर्ण करा.


कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा. 

कवितेतील संदर्भ  स्पष्टीकरण
(१) मळवाट  (अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज
(२) खाचखळगे  (आ) पारंपरिक वाट
(३) मूक समाज  (इ) अडचणी, कठीण परिस्थिती

चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा.

पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती  पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती
____________ ____________
____________ ____________
____________ ____________

‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून (तू झालास मूक समाजाचा नायक) जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

तू झालास मूक समाजाचा नायक

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृत्या पूर्ण करा. (२)

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ___________
  2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करणारे - ___________

2. सत्य विधान ओळखा. (२)

  1. बाबासाहेब निघाले तेव्हा सूर्यफुलांनी त्यांचे स्वागत केले.
  2. बाबासाहेब बोलक्या जिवांचे नायक झाले.
  3. चवदार तळ्यावर बाबासाहेबांनी गुलामांच्या पायात बेड्या चढवल्या.
  4. विषम परिस्थितीवर स्वार होत बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला.

तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.

तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.

तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.

3. ओळींचा सरळ अर्थ लिहा. (२)

'तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत' या ओळींचा सरळ अर्थ लिहा.

4. विचार साैंदर्य लिहा. (२)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

तू झालास मूक समाजाचा नायक

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.

तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.

तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.

1. असत्य विधान ओळखा. (२)

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांना महाकाव्याइतके महत्त्व प्राप्त झाले.
  2. पन्नास वर्षांनंतरही सूर्यफुले काळोखाच्या प्रदेशाचा ध्यास घेत उभी आहेत.
  3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाकडे पाहून साध्या काठ्यांच्याही संगिनी झाल्या.
  4. चवदार तळ्याच्या सत्याग्रहात जनमानस पेटून उठले होते.

2. खालील आकृती पूर्ण करा. (२)


पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

तू झालास मूक समाजाचा नायक

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
  3. दोन शब्दांचे अर्थ (२)
    अ) डचमळणे -
    ब) रणशिंग -

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायेत,
बिगूल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

1. चौकटी पूर्ण करा:  (2)

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______

तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.

तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.

तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.

2. आकृतिबंध पूर्ण करा:  (2)

3. खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा:  (2)

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास

4. काव्यसौंदर्यः  (2)

‘आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.’

या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×