- एखादी व्यक्ती एकाच वेळी जितक्या उद्दीपकांवर लक्ष केंद्रित करू शकते, त्या संख्येला ‘अवधान कक्षा’ म्हणतात. मानवाची अवधान कक्षा मर्यादित स्वरूपाची असते.
- सामान्य व्यक्तीची अवधान कक्षा साधारणपणे ७ ते ८ घटकांपर्यंत मर्यादित असते. त्यामुळे दूरध्वनी क्रमांक किंवा वाहनांचे क्रमांकही बहुतेक वेळा ७ ते ८ अंकांच्या मर्यादेत ठेवलेले असतात.
- बुद्धिमत्ता, वय, सराव आणि अनुभव यांसारखे घटक अवधान कक्षेवर प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ, सहा महिन्यांच्या बालकाच्या तुलनेत सहा वर्षांच्या मुलाची अवधान कक्षा अधिक विकसित असते.
Advertisements
Advertisements
Question
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
अवधान कक्षा
Advertisements
Solution 1
आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक उद्दिपकांची आपल्याला ज्ञानेद्रीयांमार्फत सतत जाणीव होत असते. परंतू सभोवतालच्या सर्वच उद्दीपकांकडे आपले एकाच वेळी लक्ष जात नाही. आपण काही उद्दीपकांची निवड करतो व त्यामुळे त्याच उद्दीपकांची आपल्याला जाणीव होते. म्हणूनच अवधान ही निवडक प्रक्रिया आहे. अनेक मानसशास्त्रज्ञांनी अवधानासंदर्भात विविध व्याख्या दिल्या आहेत.
गिलफोर्डच्या मते- “जाणीवेच्या क्षेत्रातील वस्तू, व्यक्ति व घटना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय.”
अवधान कक्षा म्हणजे, व्यक्ती एकाच दृष्टीक्षेपात जेवढ्या उद्दीपकांकडे लक्ष देऊ शकते, ती संख्या होय. आपली अवधान कक्षा अत्यंत मर्यादित आहे. सामान्य व्यक्तीची अवधान कक्षा ७ ते ८ अंकांपर्यंत किंवा अक्षरापर्यंत मर्यादित असते. म्हणूनच पोष्टाचेपिनकोड किंवा दूरध्वनी क्रमांक कधीही ७ ते ८ अंक या मर्यादेपेक्षा अधिक मोठे नसतात. वय, बुद्धिमत्ता, सराव, अनुभव इत्यादी घटकांचा अवधान कक्षेवर परिणाम होतो. उदा., सरावामुळे टेलिफोन ऑपरेटर किंवा टंकलेखक यांची अवधान विस्तार कक्षा सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा अधिक असू शकते.
Solution 2
Notes
Students should refer to the answer according to their preferred marks.
