English

१८२२ च्या अखेरीस लेफ्टनंट औट्रॅम भिल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

१८२२ च्या अखेरीस लेफ्टनंट औट्रॅम भिल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला.

Short/Brief Note
Advertisements

Solution

(१) १८१८ साली खानदेश इंग्रजांच्या ताव्यात गेल्यावर सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्लांनी गोंदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली उठाव केले.

(२) १८२२ च्या दरम्यान 'हरिया' या भिल्लांच्या म्होरक्याने केलेला उठाव मोडून काढण्यात आला.

(३) लेफ्टनंट औट्रॅम याने भिल्लांचा उठाव मोडून काढतानाच भिल्लांमध्ये राहून त्याने त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जंगल सोडून शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला.

(४) माफीचे जाहीरनामे, जमिनी देणे, तगाई, मागील गुन्ह्यांना माफी, सैन्यात भरती अशा योजना त्याने राबवल्या.

या उपायांमुळे भिल्लांच्या उठाव करण्याच्या प्रमाणात घट झाली. या मार्गाने औट्रम भिल्लांचे उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला.

shaalaa.com
१८५७ पूर्वीचे लढे
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष - स्वाध्याय [Page 52]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 6 वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
स्वाध्याय | Q ४.१ | Page 52
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×