Please select a subject first
Advertisements
Advertisements
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
Concept: undefined >> undefined
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
Concept: undefined >> undefined
Advertisements
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
'तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.'
Concept: undefined >> undefined
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
|
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू झालास परिस्थितीवर स्वार तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तुझे शब्द जसे की आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय |
1. असत्य विधान ओळखा. (२)
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांना महाकाव्याइतके महत्त्व प्राप्त झाले.
- पन्नास वर्षांनंतरही सूर्यफुले काळोखाच्या प्रदेशाचा ध्यास घेत उभी आहेत.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाकडे पाहून साध्या काठ्यांच्याही संगिनी झाल्या.
- चवदार तळ्याच्या सत्याग्रहात जनमानस पेटून उठले होते.
2. खालील आकृती पूर्ण करा. (२)

Concept: undefined >> undefined
पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
- दोन शब्दांचे अर्थ (२)
अ) डचमळणे -
ब) रणशिंग -
Concept: undefined >> undefined
पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
वस्तू
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
- दोन शब्दांचे अर्थ (२)
अ) डचमळणे -
ब) रणशिंग -
Concept: undefined >> undefined
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायेत,
बिगूल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. खालील आकृती पूर्ण करा. (२)
जोड्या लावा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| i. संतांच्या साहित्याचा आत्मा | महाराष्ट्र |
| ii. संतांची भूमी | विश्वकल्याण |
| iii. सर्व संतांच्या मागणीतील एकमेव गोष्ट | मानवता |
| iv. सर्व संतांच्या प्रार्थनेतील आविष्कार | भक्ती व समाजप्रबोधन, समाजकल्याण |
| महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति। देह कष्टविती परउपकारें।' ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वत:साठी काहीही मागत नाहीत; परंतु 'बुडतां हे जन न देखवे डोळां। येतो कळवळा म्हणउनि।।' यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरुनानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरूंकडे साकडे घातले आहे. संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक काळातील संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे, कारण 'मी' पासून 'आम्ही' या संकल्पनेप्रमाणे 'अवघे विश्वचि माझे घर', 'वसुधैव कुटुम्बकम्' या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा 'विश्वकल्याण' याचा परिचय या पाठातून करून घेऊया. |
2. एका वाक्यात उत्तर लिहा. (२)
- विश्वकल्याण कधी शक्य आहे?
- संतांच्या साहित्यातून प्रकट झालेल्या संकल्पना सांगा.
3. स्वमत. (३)
'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति। देह कष्टविती परउपकारें' या चरणाचा अर्थ उदाहरणांसह स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. एका शब्दात उत्तर लिहा. (२)
- मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना म्हणजे.
- संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला ग्रंथ.
| संत ज्ञानेश्वरांच्या 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते; परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली. संत ज्ञानेश्वर 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते, तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, ’’आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात. तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा“, यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, ’’मी देवापाशी आधी मागितले आहे. ते, म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी.“ संत निवृत्तीनाथ म्हणाले, ’’ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा.“ यातून पसायदान निर्माण झाले. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात. त्यांचा दाखला देत, 'आपणही गुण्यागोविंदाने राहावे', हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. |
2. कोष्टक पूर्ण करा. (२)

3. स्वमत. (३)
निसर्गातील सर्व घटकाप्रमाणे माणसाने पण गुण्यागोविंदाने राहण्यासाठी प्रत्येकाने काय केले पाहिजे असे तुम्हांला वाटते.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (२)
१) ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा जपायचा असेल तर _____________
- माणसाने एकमेकांशी अजिबात बोलले नाही पाहिजे.
- मन सुसंस्कृत असायला हवे.
- दररोज एकमेकांच्या घरी जावे.
- विज्ञानाची मदत घ्यावी.
२) जगण्याचे खरे सूत्र ___________
- स्वत: चांगले जगावे.
- शेजारी सांगितले तसे जगावे.
- कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जगावे.
- सगळ्यांना सावली देत जगावे.
| आजच्या विज्ञानयुगात विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात 'हे विश्वचि माझे घर आहे,' ही कल्पना केली होती याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो; पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे. नाहीतर, राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात; पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे. वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. झाडे स्वत: ऊन सोसतात. लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वत: चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसर्याचाही विचार करावा; असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल. सुखी होईल. |
2. पुढील घटकांची प्रत्येकी दोन वैशिष्ट्ये लिहा. (२)
- झाडे -
- पर्वत -
3. स्वमत. (३)
वरील उताऱ्याच्या आधारे विज्ञान हवा की निसर्ग, का ते थोडक्यात स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
टिपा लिहा.
व्युत्पत्ती कोशाची निर्मिती
Concept: undefined >> undefined
टिपा लिहा.
व्युत्पत्ती कोश
Concept: undefined >> undefined
व्युत्पत्ती कोश पाहण्यासाठीची पद्धत सोदाहरणासहित सांगा.
Concept: undefined >> undefined
पुढील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा.
| व्युत्पत्ती कोश | ||
| निर्मितीचा ठराव | निर्मितीची जबाबदारी | निर्मितीसाठी अर्थसाहाय्य |
Concept: undefined >> undefined
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
धरणीमाता (धरणी व माता हे शब्द वगळून)
Concept: undefined >> undefined
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
बालपण (बाल व पण हे शब्द वगळून)
Concept: undefined >> undefined
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
सदासर्वकाळ (सदा व सर्वकाळ हे शब्द वगळून)
Concept: undefined >> undefined
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
मूकसमाज (मूक व समाज हे शब्द वगळून)
Concept: undefined >> undefined
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
गगनभरारी (गगन व भरारी हे शब्द वगळून)
Concept: undefined >> undefined
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
महानगरपालिका (महा, नगर व पालिका हे शब्द वगळून)
Concept: undefined >> undefined
