Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. एका शब्दात उत्तर लिहा. (२)
- मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना म्हणजे.
- संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला ग्रंथ.
| संत ज्ञानेश्वरांच्या 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते; परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली. संत ज्ञानेश्वर 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते, तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, ’’आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात. तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा“, यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, ’’मी देवापाशी आधी मागितले आहे. ते, म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी.“ संत निवृत्तीनाथ म्हणाले, ’’ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा.“ यातून पसायदान निर्माण झाले. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात. त्यांचा दाखला देत, 'आपणही गुण्यागोविंदाने राहावे', हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. |
2. कोष्टक पूर्ण करा. (२)

3. स्वमत. (३)
निसर्गातील सर्व घटकाप्रमाणे माणसाने पण गुण्यागोविंदाने राहण्यासाठी प्रत्येकाने काय केले पाहिजे असे तुम्हांला वाटते.
Advertisements
उत्तर
1.
- पसायदान
- ज्ञानेश्वरी
2.
| निसर्गातील कोणकोणते घटक एकत्र राहतात | |||
| फुले | वृक्ष | निर्झर | नद्या |
3. निसर्गातील सर्व घटक एकोप्याने राहतात, म्हणून निसर्गाची कार्ये हजारो वर्षे अविरतपणे सुरू आहेत. माणसाने निसर्गातील इतर घटकांकडून बोध घेऊन एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहण्याची, तसेच निसर्गातील इतर घटकांशी योग्यप्रकारे वागण्याची गरज आहे. आपण श्रेष्ठ आहोत ही भावना नाहीशी झाली, तर इतरांबद्दल आपल्या मनात प्रेम, दया, सहकार्य करण्याची वृत्ती निर्माण होईल. धर्म, जात, वंश, देश, राज्य या विविध कारणांमुळे होणारा भेदभाव नष्ट होईल. एकमेकांना मदत करून मानवी कल्याण साधण्याचा प्रयत्न केला गेला, तर संत ज्ञानेश्वरांची 'हे विश्वचि माझे घर' ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होईल.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील चौकट पूर्ण करा.
संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना - ______
खालील चौकट पूर्ण करा.
मानवी सुखदु:खाशी सहृदयतेने समरस होणे - ______
खालील चौकट पूर्ण करा.
‘सर्वांभूती भगवद्भावो’ अशी प्रार्थना करणारे संत - ______
खालील चौकट पूर्ण करा.
सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत - ______
खालील चौकट पूर्ण करा.
संत तुकारामांचे जीवनसूत्र - ______
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

फरक सांगा.
| सामान्य माणसाचे मागणे | संतांचे मागणे |
| (अ) | (अ) |
| (आ) | (आ) |
खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा.
जे खळांची व्यंकटी सांडो - ______
खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा.
दुरिताचें तिमिर जावो - ______
सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.
‘भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
या पाठातून (सर्व विश्वचि व्हावे सुखी) तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
