Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
Advertisements
उत्तर
नाण्याला नेहमी दोन बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे फायदे व तोटे अशा दोन बाजू असतात. रेल्वेप्रवासाच्या फायद्यांचा विचार केला, तर सर्वांत स्वस्त, वेगवान व वाहतुकीची प्रचंड क्षमता असणारा हा मार्ग आहे. रेल्वेमुळे केवळ प्रवाशांचीच नव्हे, तर मालाची वाहतूक करणेही सोपे होते. लांब पल्ल्याच्या रेल्वेत तर खानपानाची, प्रसाधनगृहांची, झोपण्याची सोय असल्याने हा मार्ग अत्यंत सुखावह आहे. रेल्वेमुळे देशाला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते.
फायद्यांबरोबरच रेल्वे प्रवासाचे काही तोटेही आहेत. रेल्वेमार्गाचे जाळे निर्माण करणे अत्यंत कठीण व खर्चिक काम आहे. त्यांच्या डागडुजीसाठीही प्रचंड प्रमाणात खर्च येतो. डोंगराळ भागांमध्ये रेल्वे मार्गांची उभारणी शक्य होत नाही. अशा भागांत रेल्वे गाड्यांचे अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते. या जाळ्यांद्वारे सर्वच ठिकाणे जोडणे शक्य होत नाही. याशिवाय, महानगरांमधील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या, प्रचंड गर्दी, अनियमित गाड्या आणि जीवितास धोका या बाबींना प्रवाशांना रोज सामोरे जावे लागते. असे जरी असले तरी रेल्वेशिवाय भारताची कल्पना करणे शक्यच नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
वाक्य पूर्ण करा.
घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे -
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
आकृतिबंध पूर्ण करा.

______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.

गुणवैशिष्ट्ये लिहा.

कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.
'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.
फरक स्पष्ट करा.
| दक्षिणेतील हवामान | उत्तरेतील हवामान |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
| (३) | (३) |
पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
| जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब | ||
| मुद्दा | कुटुंब क्र. १ | कुटुंब क्र. २ |
| परसदार | ||
| माणसे | ||
| स्त्रिया | ||
| पाणी जमीन | ||
| हिरवा आनंद | ||
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.

‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.
