Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
Advertisements
उत्तर
नाण्याला नेहमी दोन बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे फायदे व तोटे अशा दोन बाजू असतात. रेल्वेप्रवासाच्या फायद्यांचा विचार केला, तर सर्वांत स्वस्त, वेगवान व वाहतुकीची प्रचंड क्षमता असणारा हा मार्ग आहे. रेल्वेमुळे केवळ प्रवाशांचीच नव्हे, तर मालाची वाहतूक करणेही सोपे होते. लांब पल्ल्याच्या रेल्वेत तर खानपानाची, प्रसाधनगृहांची, झोपण्याची सोय असल्याने हा मार्ग अत्यंत सुखावह आहे. रेल्वेमुळे देशाला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते.
फायद्यांबरोबरच रेल्वे प्रवासाचे काही तोटेही आहेत. रेल्वेमार्गाचे जाळे निर्माण करणे अत्यंत कठीण व खर्चिक काम आहे. त्यांच्या डागडुजीसाठीही प्रचंड प्रमाणात खर्च येतो. डोंगराळ भागांमध्ये रेल्वे मार्गांची उभारणी शक्य होत नाही. अशा भागांत रेल्वे गाड्यांचे अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते. या जाळ्यांद्वारे सर्वच ठिकाणे जोडणे शक्य होत नाही. याशिवाय, महानगरांमधील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या, प्रचंड गर्दी, अनियमित गाड्या आणि जीवितास धोका या बाबींना प्रवाशांना रोज सामोरे जावे लागते. असे जरी असले तरी रेल्वेशिवाय भारताची कल्पना करणे शक्यच नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतिबंध पूर्ण करा.

खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.
______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.

फरक स्पष्ट करा.
| दक्षिणेतील हवामान | उत्तरेतील हवामान |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
| (३) | (३) |
वाक्य पूर्ण करा.
आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
कारणे लिहा.
पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण....
पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
| जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब | ||
| मुद्दा | कुटुंब क्र. १ | कुटुंब क्र. २ |
| परसदार | ||
| माणसे | ||
| स्त्रिया | ||
| पाणी जमीन | ||
| हिरवा आनंद | ||
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
जोड्या जुळवा.
| शिक्षक | गुणवैशिष्ट्य |
| (१) श्री. नाईक | (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ |
| (२) श्री. देशमुख | (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ |
| (३) श्री. गोळीवडेकर | (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय |
| (४) श्री. कात्रे | (ई) शेतीतज्ज्ञ |
चौकटी पूर्ण करा.
पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
| ______ | ______ | ______ | ______ |
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. |
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.
