हिंदी

‘स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

माणसाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी कवी मोरोपंत यांनी ‘भरतवाक्य’ या केकावलीमध्ये जनांना मोलाचा उपदेश केला आहे.

माणसाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी स्वत:मधील स्वतत्त्व मनोमन ओळखावे. आत्मविश्वास वाढवावा, गर्विष्ठपणा त्याग करावा. दुरभिमान अजिबात बाळगू नये. आपले मन वाईट विचारांनी मलीन, भ्रष्ट करू नये. मन शुद्ध करावे. आत्मज्ञान वाढवावे. आत्मज्ञान मध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून टाकाव्यात.

shaalaa.com
भरतवाक्य
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: भरतवाक्य - कृती [पृष्ठ ४७]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 12 भरतवाक्य
कृती | Q (५) (आ) | पृष्ठ ४७

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ______ 


खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा.

गोष्टी विनंती
(१) निश्चय ______
(२) चित्त ______
(३) दुरभिमान ______
(४) मन ______

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

न निश्चय कधीं ढळो


‘सुसंगती सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;’ या ओळींचे रसग्रहण करा.


सत्प्रवृत्त व्यक्तीची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.


वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा.


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. उत्तरे लिहा. (२)

1. सुसंगतीचे महत्त्व

  1. ___________
  2. __________

2. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी करावयाचे उपाय. (२)

  1. ___________
  2. ___________

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
सदंघ्रिकमळी दडो; मुरडितां हटानें अडो;
वियोग घडतां रडो; मन भवच्चरित्रीं जडो।।

न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गीं वळो;।
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो।।

मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली;।
कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रगट हे निजाश्रितजनां सदा सांवरी।।

3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (२)

मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली;।

4. काव्यसाैंदर्य. (२)

खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारे विचार साैंदर्य स्पष्ट करा.

स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो।।


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. उत्तरे लिहा. (२)

1. मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करावयाच्या गोष्टी

  1. ___________
  2. __________

2. परमेश्वराला उद्देशून वापरलेली संबोधने (२)

  1. ___________
  2. ___________

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
सदंघ्रिकमळी दडो; मुरडितां हटानें अडो;
वियोग घडतां रडो; मन भवच्चरित्रीं जडो।।

न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गीं वळो;।
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो।।

मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली;।
कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रगट हे निजाश्रितजनां सदा सांवरी।।

3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (२)

न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गीं वळो;।

4. काव्यसाैंदर्य. (२)

खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारे भावसाैंदर्य स्पष्ट करा.

कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रकट हे निजाश्रितजनां सदा सांवरी।।


खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

मुखीं हरि! वसो तुझी
कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी
सकलकामना मावली;।।


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×