Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मी अनुभवलेला पाऊस’ या विषयावर निबंध लिहा.

Advertisements
उत्तर
मी अनुभवलेला पाऊस
जून महिना सुरू झाला होता. उन्हाचा त्रास कमी झाला होता. तरीही अजून उकाडा जाणवत होता. शहरातील डांबरी रस्त्यांवरून उष्णतेची तीव्रता जाणवत होती. सर्वांच्या मनाला वेध लागले होते. पावसाचे! माणसांप्रमाणेच पशुपक्षी, झाडे देखील पावसाची आतुरतेने वाट बघत होते.
अचानक एके दिवशी दुपारी अंधार पडला. थंडगार वारा वाहू लागला. बघता बघता झुळूक सोसाट्याच्या वाऱ्यात बदलली. परिसरातील धूळ वाऱ्याबरोबर उडू लागली. आकाशात काळे ढग जमा झाले होते. आम्हाला काही कळायच्या आतच पाऊस जोरात कोसळू लागला. मातीचा गंघ दरवळला. सर्वांच्या ओठांत एकच धून घुमली, “पाऊस आला!' क्षणात वातावरण आनंदून गेले.
थेंबांचा वेग वाढला. सरीवर सरी बरसू लागल्या. ढगांचा गडगडाट झाला आणि विजांचा कडकडाट होऊ लागला. अचानक आलेला पाऊस संध्याकाळ झाली तरी बरसतच होता. कामावरून घरी परतणाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. छत्री व रेनकोट कुणाकडेच नसल्याने काहीजण भिजत भिजत परतत होते. आज पावसाने खोडकर मुलांप्रमाणे सगळ्यांवर चाल खेळली. अंगणात दोरीवरून कपडे उतरवत असताना शेजारच्या काकू पावसाने भिजल्या. तरीही पावसाबद्दल सर्वांच्या चेहऱ्यावर कृतज्ञता होती. लहान मुले “पाऊस आला मोठ्ठा” असं भिजत भिजत म्हणत होती. झाडांच्या पानांवरची धूळ साफ झाली होती. पाने चकाकू लागली होती. धरती न्हाऊन निघाली होती. उन्हामुळे हैराण झालेले सर्व सुखावले होते.
सृष्टीत झालेला हा बदल मला खूप आवडला. पावसाने माझे मन सुखावले. उत्साह जाणवू लागला होता. निसर्गदेखील चेतन्याने फुलून आला होता. संध्याकाळी उशिरा कधीतरी पाऊस थांबला. पावसाने आज नव्या ऋतूची सुरुवात केली होती. असा हा जादुगार पाऊस सर्वांवर आनंदाची बरसात करून गेला होता.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
‘मैं प्रकृति बोल रही हूँ’ विषय पर निबंध लेखन कीजिए।
‘संगणक की आत्मकथा’ इस विषय पर अस्सी से सौ शब्दों में निबंध लिखिए।
‘युवापीढ़ी का उत्तरदायित्व’ विषय पर लगभग सौ शब्दों में निबंध लिखिए।
निम्नलिखित दिए गए शीर्षक पर लगभग 150 शब्दों में रचनात्मक लेखन लिखिए।
विद्यालय में मेरा प्रिय कोना
निबंध लेखन -
एक बाढ़ पीड़ित की आत्मकथा
निबंध लिखिए:
घायल सैनिक की आत्मकथा
निम्नलिखित दिए गए शीर्षक पर लगभग 120 शब्दों में रचनात्मक लेख लिखिए।
मैच खेलने का अवसर
निबंध लिखिए -
भ्रष्टाचार
निबंध लिखिए:
सफलता
निबंध लिखिए-
विद्यार्थी और अनुशासन
निबंध लिखिए -
जल संचयन
निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए।
एक किसान की आत्मकथा
निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए।
मेरा प्रिय खेल
‘प्रदूषण मुक्त त्योहार’ इस विषय पर निबंध लिखिए।
‘करत-करत अभ्यास के जड़मति होत सुजान’ इस विषय पर भाषाई सौंदर्यवाले वाक्यों, सुवचन, दोहे आदि का उपयोग करके निबंध/कहानी लिखिए ।
रामवृक्ष बेनीपुरी द्वारा लिखित ‘गेंहूँ बनाम गुलाब’ निबंध पढ़िए और उसका आकलन कीजिए ।
‘यदि मैं शिक्षा मंत्री होता -----’ विषय पर लगभग सौ शब्दों में निबंध लिखिए।
