Advertisements
Advertisements
Question
वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.
Advertisements
Solution
ललित आणि वैचारिक साहित्यातून विलक्षण अनुभव मिळतात. ते वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते वाचल्यावर वाचकांच्या मनावर काही ना काही परिणाम होतोच. त्या पुस्तकातून भोवतालच्या परिस्थितीचे दर्शन घडते. त्यातल्या दुःखद घटनांनी वाचकांचे हृदय पिळवटून जाते. त्या परिस्थितीतील दुःखाची जाणीव होते. ही अशी स्थिती वाईट आहे. ती तशी असता कामा नये. ती बदलली पाहिजे. असे विचार मनात येतात. मग माणसे ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतात. नवीन चांगली स्थिती आणण्याच्या विचारांना पाठिंबा देतात.
उदाहरणार्थ, दया पवार यांचे 'बलुतं' हे आत्मकथनात्मक पुस्तक पाहा. यात दलित समाजाचे अत्यंत हीनदीन अवस्थेतील चित्रण केलेले आहे. हे वाचल्यावर वाचकाला दुःख होते. संतापही येतो. मग जातीयता, धर्मांधता या तत्त्वांविरुद्ध त्याच्या मनात तिडीक निर्माण होते. याचा अर्थ 'बलुतं' हे पुस्तक माणुसकी ची बाजू घेतो. गुलामगिरी विरुद्ध, अन्यायाविरुद्ध ते पुस्तक माणसाला लढायला प्रवृत्त करते. म्हणजे अशी पुस्तके माणसाला चांगले जग निर्माण करण्याची प्रेरणा देतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
तुलना करा.
| 'पुस्तकरूपी' मित्र |
'मानवी' मित्र |
| ............. | ............. |
| ............. | ............. |
| ............. | ............. |
| ............. | ............. |
कारणे लिहा.
ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण .............
कारणे लिहा.
प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही,’ असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण .............
कृती करा:

कृती करा:

अर्थ स्पष्ट करा.
दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे.
अर्थ स्पष्ट करा.
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे.
पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.
हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'उत्तम साहित्यकृती आपल्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात', हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
'निष्ठावंत वाचक आता दुर्मीळ झाले आहेत,' हे विधान स्पष्ट करा.
