Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
|
कथा वाचताना अनेकदा ‘आता पुढे काय होणार’ अशी उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण होते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते. कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते. कथेतील पात्रे आणि प्रसंग यांची गुंफण अशा कौशल्याने केलेली असते, की वाचक त्यात तल्लीन होऊन जातो. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होते. यादृष्टीने पाठ्यपुस्तकातील ‘शोध’ ही कथा एकदा वाचा. त्या कथेतील आकस्मिक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित शेवट या सर्वांमुळे उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहते, हे तुमच्या लक्षात येईल. कथा एककेंद्री असते. कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. |
(१) (२)
- फ्लॅशबॅक लेखनशैली म्हणजे
- कथा लहान असणे कारण
कथा वाचकांची उत्कंठा वाढवणे
(२) ‘कथा मानवी जीवनाचा वेध घेते’ या विधानाचा समजलेला अर्थ तुमच्या भाषेत लिहा. (२)
Advertisements
Solution
(१)
- वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे.
- कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण हे मर्यादित असते.
(२) कथा ही जीवनस्पर्शी असते. राजाराणी, टॅक्सीड्रायव्हर, नर्स, लोकसेवक असो त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथींचा धांडोळा घेण्याचे सामर्थ्य कथेत असते. कथा या साहित्यप्रकाशाला कोणताच जीवनाविषय वर्ज्य नसतो मानवी जीवनाचा विचार करना त्याच्या बालपणापासूनच कथेने मानवी जीवनात प्रवेश केलेला असतो. अशाप्रकारे कथा ही मानवी जीवनाचा थेट वेध घेताना दिसते.
