Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट लिहा:
जागतिकीकरणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सर्वसामान्य माणसावर झालेले परिणाम -
- जागतिकीकरणाचा अर्थ
- बहुराष्ट्रीय कंपनीचा अर्थ
- श्रमिक बाजारावरील झालेले परिणाम
- लहान उद्योगावर झालेले परिणाम
- शेती क्षेत्रावर झालेले परिणाम
Very Long Answer
Advertisements
Solution
- जागतिकीकरणाचा अर्थ: राष्ट्रीय अर्थव्यवस्थांचे जागतिक अर्थव्यवस्थेत एकत्रीकरण करण्याच्या प्रक्रियेला जागतिकीकरण असे म्हटले जाते. ही प्रक्रिया वस्तू, भांडवल, तंत्रज्ञान आणि कुशल कामगार यांच्या जागतिक स्तरावरील निर्बंधमुक्त व्यापाराचे सूचन करते. यामुळे राष्ट्रांना एकमेकांपासून वेगळे करणाऱ्या सीमा नष्ट झाल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे जागतिकीकरणाच्या या प्रवृत्तीला चालना मिळाली आहे.
- बहुराष्ट्रीय कंपनीचा अर्थ: बहुराष्ट्रीय कंपन्या, ज्यांना कधीकधी आंतरराष्ट्रीय कंपन्या असेही म्हटले जाते, या अशा कंपन्या आहेत ज्यांना सीमा नसतात. त्यांचे मुख्यालय कोणत्याही एका विशिष्ट देशात नसते. त्या जागतिक व्यापार आणि उत्पादनात गुंतलेल्या असतात. भारतात, युनिलिव्हरला हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणून ओळखले जाते. सुप्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नेसले, बायर, सिमेन्स आणि जनरल इलेक्ट्रिकल्स यांचा समावेश आहे.
- श्रमिक बाजारावरील झालेले परिणाम: कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रांतून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर होताना दिसून येते. उदा., या कंपन्या कुशल व अर्धकुशल कामगारांची भरती करून घेतात. आज पश्चिम आशिया, आफ्रिका, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी अनेक कुशल व अर्धकुशल भारतीय कामगार काम करत आहेत. खासगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. उदा., खानपान, मालवितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी.
- लहान उद्योगावर झालेले परिणाम: लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालविली जातात ती त्या स्पर्धेत टिकून आहेत. आज शहरात मोठी किराणा दुकाने किंवा मॉल्स जरी उभी राहिली असली तरी देखील छोटे दुकानदार, भाजी किंवा फळ विक्रेते हे आज देखील ग्राहक मिळवत आहेत. याचे कारण ते आपल्या ग्राहकाला आवश्यक सेवा देतात.
- शेती क्षेत्रावर झालेले परिणाम: आज शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांना मध्यस्तीशिवाय थेट विकू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणले आहे. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. उदा., भारत समुद्री उत्पादने, मांस, तांदूळ, मसाले, कापूस, ताजी फळे आणि भाज्या, साखर, कॉफी, भुईमूग, काजू इत्यादी गोष्टी निर्यात करत आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
