Advertisements
Advertisements
प्रश्न
‘स्वसामर्थ्याची जाणीव’ हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, हे विधान स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. समस्यांचा सामना करता करता कधी माणूस हतबल होऊन जातो. मग तो देवावर हवाला ठेवू लागतो. नशिबाला दोष देतो. पण हे असे वागणे अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे।' अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे. त्याप्रमाणे आत्मबळ एकवटणे महत्त्वाचे ठरते. स्वत:च्या सामर्थ्यावर भरवसा ठेवता आला पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली. 'रयत शिक्षण संस्था' निर्माण केली. आज त्याचा महावृक्ष झाला आहे. यावरून असे स्पष्ट होते की 'स्वसामर्थ्याची जाणीव' हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
सुखलोलुप झाली काया म्हणजे ______
पिंजरा सोडून झेप घेतल्याने ______
तुलना करा.
| पिंजऱ्यातील पोपट | पिंजऱ्याबाहेरील पोपट |
| ______ | ______ |
| ______ | ______ |
| ______ | ______ |
पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील (आकाशी झेप घे रे) ओळी शोधून लिहा.
कवीने (आकाशी झेप घे रे) यशप्राप्तीच्या संदर्भांत सांगितलेली सुवचने लिहा.
____________
____________
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले’
‘आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा’, या ओळीतील मथितार्थ स्पष्ट करा.
‘घर प्रसन्नतेने नटले’, याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
- प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
1. कलंक - ___________
2. सकलकामना - __________
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृतिबंध पूर्ण करा. (२)

|
आकाशी झेप घे रे पाखरा तुजभवती वैभव, माया तुज पंख दिले देवाने कष्टाविण फळ ना मिळते घामातुन मोती फुलले |
2. तुलना करा. (२)
| पिंजऱ्यातील पोपट | पिंजऱ्याबाहेरील पोपट |
3. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा
4. पुढील काव्यपंक्तीतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा. (२)
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळत
खालील मुद्दयांचा आधारे 'आकाशी झेप घे रे' या कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
| क्र. | प्रश्न | उत्तर |
| १ | कवी किंवा कवयित्रीचे नाव. | |
| २ | कवितेचा विषय. | |
| ३ | प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. उदा. व्यथा, वैभव सुखलोलुप, साजिरा | |
| ४ | कवितेतून मिळणारा संदेश. | |
| ५ | प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा. | |
| ६ | कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा. |
खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
खालील पंक्तींचे रसग्रहण करा.
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा’
