Advertisements
Advertisements
प्रश्न
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.
Advertisements
उत्तर
जैव विविधतेची गरज
आपण सर्व पृथ्वीतलावर राहतो. मानवांप्रमाणेच इतरही सजीव, त्यांच्या विविध जाती-प्रजाती येथे राहतात. अशा सजीव-नीर्जीव, नैसर्गिक, मानवनिर्मित घटकांचे मिळून एक पर्यावरण तयार होते. या पर्यावरणातील प्रत्येक घटक विशेष असतो, मग तो वनस्पती असो, की प्राणी; बलाढ्य असो वा साधा जीवजंतू. प्रत्येकाचीच भूमिका येथे महत्त्वाची ठरते. 'जीवो जीवस्य जीवनम्' असे म्हणतात. निसर्गातील सर्वच घटक एकमेकांवर अवलंबून असतात. गवत खाणारे शाकाहारी प्राणी, त्यांच्यावर जगणारे मांसाहारी प्राणी, हे प्राणी मेल्यावर त्यांच्यावर जगणाऱ्या अळ्या, जीवजंतू हे सर्वच एका अन्नसाखळीचे घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकाचे या सृष्टीत टिकून राहणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यामुळेच आपले अस्तित्व ही टिकून आहे म्हणून निसर्गातील विविधता जपणे हे आपले कर्तव्य आहे.
आज हवा, पाणी, माती अशा अनेक प्रकारच्या नैसर्गिक व मानवनिर्मित प्रदूषणांमुळे निसर्गातील जैवविविधतेला हानी पोहोचत आहे. निसर्ग आपल्या 'गरजा' पूर्ण करू शकेल, पण हाव पूर्ण करू शकणार नाही, असे गांधीजी म्हणाले होते. आज मानवाच्या हव्यासापायी जैवविविधता मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहे. पूर्वी आपल्या सजीव सृष्टीत प्रचंड विविधता होती. अनेक दुर्मीळ प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, त्यांचे प्रकार, उपप्रकार त्यात आढळत. मानवाच्या कृत्यांमुळे ह्या प्रजाती काळाच्या ओघात नष्ट झाल्या व होत आहेत. त्यामुळे, निसर्गाचा समतोल बिघडला आहे व दिवसेंदिवस नवनवीन पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
असं म्हटलं जातं, की आपल्याला ही पृथ्वी आपल्या आधीच्या पिढ्यांकडून वारसाहक्काने मिळालेली नाही, तर आपण ही पृथ्वी आपल्या पुढच्या पिढ्यांकडून उधार घेतली आहे, म्हणून ही पृथ्वी आपल्यासाठी व भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी एक अनमोल खजिना म्हणून सांभाळणे ही आज काळाची गरज बनली आहे. पृथ्वीवर असणारी जैवविविधता आपणा सर्वांसाठी आवश्यक आहे, म्हणूनच ही समृद्धी जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे कारण निसर्ग आहे तरच आपण आहोत. निसर्गातील प्रत्येक लहानापासून मोठ्या घटकाचे स्थान हे तितकेच अमूल्य आहे. त्यामुळे, जैवविविधतेची गरज ओळखून पृथ्वीवरील संपूर्ण सजीवसृष्टी सुरक्षित राखण्यासाठी आपणास प्रयत्न करायला हवेत.
संबंधित प्रश्न
खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.
|
दिनांक: २० डिसेंबर लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. |
(१) कोण ते लिहा.
(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-
(आ) समारंभाचे अध्यक्ष-
(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-
(२) उत्तर लिहा.
(अ) शिबिरार्थींची संख्या-
(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला-
(इ) शिबिराचे ठिकाण-
(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख-
(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.

तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.

रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.
खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) उत्तरे लिहा.
- जाहिरातीचा विषय -
- जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
- वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
- जाहिरात कोणासाठी आहे?
(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?
(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.

नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.

माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.
फॅक्स, पत्र, इ-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.
| एकतर्फी माहितीची/संवादाची साधने | दुतर्फी माहितीची/संवादाची साधने |
‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.
|
प्रतिज्ञा आम्ही आमचे वर्तन बदलू. __________________ __________________ __________________ |
दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा.

‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.
महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा.
खालील मुद्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.
सकाळची वेळ ...... बाबांबरोबर फिरायला ...... झाडांवर बसलेले पाखरांचे थवे ...... किलबिल ...... शुद्ध हवा ...... आल्हाददायक वातावरण ...... बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे ...... दिवसभर ताजेतवाने वाटणे.
तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
सहलीत तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहीत आहे.
