Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.
Advertisements
उत्तर
साहिल बोरकर,
३०२, साई धाम,
दादर (प).
मुंबई- ४०० ०२५
दि. १० जून २०१८
प्रिय सुहास,
सप्रेम नमस्कार,
कसा आहेस तू? काका-काकू कसे आहेत? तू नाशिकला गेल्यापासून एकदाही आपण भेटलो नाही. आम्ही मित्रांनी मिळून गेल्या आठवड्यात आपल्या परिसरात 'स्वच्छता अभियान सप्ताह' साजरा केला. आठवडाभर आम्ही सर्वांनी फुटपाथवर उभे राहून रस्त्यावर कुठेही थुंकणाऱ्या, कचरा टाकणाऱ्या लोकांना चांगल्या शब्दांत समज दिली. त्यातील अनेक लोकांनी आम्हांला पुन्हा असे न करण्याचे वचनही दिले आहे. तसेच, आम्ही आपल्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी जमेल तशी साफसफाई केली. आपल्या राजूदादाने बसवलेल्या 'अस्वच्छता निर्मूलन' नावाच्या पथनाट्यातही आम्ही सहभागी झालो होतो. ते पथनाट्य लोकांना खूप आवडले. शिवाय, लोकांमध्ये चांगली समज निर्माण झाली, बदल घडून आला. या सर्व उपक्रमांसाठी आपले स्थानिक नगरसेवक राजन सोनावणे यांनी त्यांचे स्वयंसेवक देऊन साहाय्य केले.
तुला सांगतो, असेच उपक्रम जर प्रत्येक गल्ली, रस्ते, गाव, शहरात राबवले गेले, तर लवकरच आपल्या देशाचा चेहरामोहराच बदलून जाईल. पुढच्या महिन्यातही आम्ही मुले असाच उपक्रम पुन्हा करणार आहोत. आम्ही राबवलेला हा उपक्रम तुला कसा वाटला ते नक्की कळव. तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे. काका-काकूंना माझा नमस्कार कळव.
तुझा मित्र,
साहिल
संबंधित प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.

रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.
| आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी’ अशी म्हण बनवायला हरकत नाही. ‘मोकळा संवाद’ असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते. |
घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.

'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.

१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...
‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.
|
प्रतिज्ञा आम्ही आमचे वर्तन बदलू. __________________ __________________ __________________ |
दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा.

खालील मुद्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.
सकाळची वेळ ...... बाबांबरोबर फिरायला ...... झाडांवर बसलेले पाखरांचे थवे ...... किलबिल ...... शुद्ध हवा ...... आल्हाददायक वातावरण ...... बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे ...... दिवसभर ताजेतवाने वाटणे.
तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.
