Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.

Advertisements
उत्तर
माझा आवडता प्राणी
मला मनीमाऊ खूप आवडतात. मी सातवीत असताना "पिकू" आमच्या घरात एखाद्या पाहुण्यासमान आली. झालं असं, की बाहेर खूप पाऊस पडत होता आणि भर पावसात एक छोटंसं मांजराचं पिल्लू आमच्या दाराशेजारच्या अडचणीच्या जागेत कुडकुडत बसलं होतं. माझं सहज लक्ष गेलं आणि मी आई-बाबांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली. मग आम्ही त्याला घरात घेतलं. त्याची काळजी घेतली. त्या दोन दिवसांत मला त्याचा खूप लळा लागला होता, म्हणून मी आई-बाबांकडे हट्ट धरून त्याला कायम घरीच ठेवून घेतले. तेव्हापासून 'पिकू' ही आमच्यासाठी 'वाघाची मावशी' अशी न राहता घरातली हक्काची सदस्य बनली आहे.
तिचा पांढराशुभ्र रंग, मऊ-मऊ अंग, गुलाबीसर ओठ, मिचमिच्या मिशा, जरा खुट्ट झालं, की हलणारे इवले-इवले कान मला खूप आवडतात. ती कधीही घरातली दुधाची भांडी पाडत नाही. घरातल्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही. तिला भूक लागली, की तिच्या बशीजवळ जाते, जर आमचं लक्ष नसेल, म्याँव म्याँव करत पायात येते. मग दुधाची व्यवस्था केल्यावर शांतपणे पुढचे व मागचे पाय दुमडून शेपटी मोकळी सोडून तळ्याकाठी पाणी प्यायला आलेल्या वाघाप्रमाणे जिभल्या चाटत ती दूध पिते. तिला दूध पिताना पाहणं म्हणजे आनंदाचा क्षण असतो. कागदावर चित्र काढावंसं वाटतं, छायाचित्रात तिला कैद करावंसं वाटतं.
सुरुवातीला कापसाची गादी अंथरलेली टोपली हेच तिचं घर होतं; पण नंतर आमचं अख्खं घर हेच तिचं हक्काचं घर झालं. आता दिवसभर एखाद्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे ती बिनधास्त घरभर वावरते. रात्री माझ्या पलंगावर येऊन निजते. आपल्या घरात येणारे उंदीरमामा तिला घाबरूनच जीव मुठीत घेऊन पळतात. आमच्या व आजूबाजूंच्या घरातल्या उंदीरमामांचा फडशा पाडणे हे तिचं आवडतं काम!
ती आल्यापासून घरातलं वातावरण बदललं. तिच्या येण्याने घरात नव्या सदस्याचं आगमन झालं. घरात उत्साह आला, चैतन्य आलं. तिच्या छोट्या छोट्या कृतींनी तिने आमचं मन जिंकलं. ती सर्वांसोबत खेळते, मस्ती करते. खूप माया लावली आहे तिनं. तिचा प्रसन्न चेहरा पाहिला, की थकवा, कंटाळा, ताणतणाव दूर होऊन जातो. घरात कोणी आजारी पडलं, की ही पिकूताई त्याच्याशेजारी जाऊन बसेल, म्याँव म्याँव करून विचारपूस करेल, पंज्यानं थोपटत बसेल. अशी जीव लावणारी पिकू मला खूप आवडते.
ती स्वत: आजारी पडली, की आम्हांला कसंतरी वाटतं. तिचं कण्हणं, केविलवाणं म्याँव म्याँव ऐकलं, की रडायलाच येतं, म्हणून ती आजारी पडू नये यासाठी आम्ही वेळच्या वेळी तिचे लसीकरण करतो.
प्राणी हे प्रेमाचे, मायेचे भुकेले असतात. ते मुके असले तरी प्रेमाची भाषा त्यांना कळते. त्यांना आपलंसं केलं, की ते आपल्याला आपलंसं करतात. घराला 'घरपण' देतात, 'पिकू' यांमुळेच माझी अत्यंत लाडकी मनीमाऊ आहे.
संबंधित प्रश्न
तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.

खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या.
|
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदु:खाचे क्षण नेहमीच येत असतात. दु:खाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील. यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्यादु:खात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दु:ख सहज हलके करू शकतो. असे सुखदु:खाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो. |
रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.
| आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी’ अशी म्हण बनवायला हरकत नाही. ‘मोकळा संवाद’ असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते. |
‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.
तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
खालील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा.


तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.
‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.
|
प्रतिज्ञा आम्ही आमचे वर्तन बदलू. __________________ __________________ __________________ |
‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात, या विषयावर मित्रांशी चर्चा करा.
अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.
खालील मुद्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.
सकाळची वेळ ...... बाबांबरोबर फिरायला ...... झाडांवर बसलेले पाखरांचे थवे ...... किलबिल ...... शुद्ध हवा ...... आल्हाददायक वातावरण ...... बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे ...... दिवसभर ताजेतवाने वाटणे.
तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.
