Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत नोंदवा.
रवींद्रनाथ टागोर यांनी ‘सर’ या पदवीचा त्याग केला.
लघु उत्तरीय
Advertisements
उत्तर
- रौलट कायद्याविरोधी सत्याग्रही लढ्याने पंजाबमध्ये प्रखर स्वरूप धारण केले. १३ एप्रिल १९१९ हा बैसाखी या सणाचा दिवस होता. बैसाखीनिमित्त अमृतसरमधील जालियनवाला बागेत आयोजित केलेल्या सभेसाठी हजारो लोक जमले होते.
- त्यातील बहुसंख्य लोकांना सभाबंदीच्या हुकुमाची कल्पना नव्हती.
- जनरल डायरने लोकांना पूर्वसूचना न देता जमावावर भीषण गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व हजारांवर जखमी झाले. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे साऱ्या भारतभर संतापाची लाट उसळली.
- रवींद्रनाथ टागोरांनी हत्याकांडाचा तीव्र शब्दांत निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या ‘सर’ या पदवीचा त्याग केला.
shaalaa.com
महात्मा गांधीजींची निःशस्त्र प्रतिकार चळवळ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
