Advertisements
Advertisements
प्रश्न
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
'पक्षी जाय दिगंतरा' ही संत जनाबाईंच्या अभंगातील ओळ आहे. पक्षी दूरवर उडून आपल्या पिलांच्या चाऱ्याची, अन्नपाण्याची सोय करतो. त्यासाठी तो कितीही दूर उडू द्या, त्याचे लक्ष सदैव आपल्या बाळापाशी, घरट्याशी असते. या पाठात वर्णन केलेले पक्षीही आपल्या उपजीविकेसाठी हजारो मैलांचे अंतर पार करत असतात. पक्ष्यांनाही आपल्या इतकीच आपल्या पिलांची, कुटुंबांची काळजी असते. हिवाळ्यात अति बर्फवृष्टी झाल्यास अन्नाचे दुर्भिक्ष निर्माण होते. परिणामी, पक्ष्यांवर व त्यांच्या पिलांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. असे होऊ नये, म्हणून पक्षी एकत्रितरीत्या अशा जागी स्थलांतर करतात, जिथे त्यांना अन्नाचा तुटवडा निर्माण होत नाही. पाठात वर्णन केलेले उत्तरेकडील पक्षी हिवाळ्याच्या आगमनापूर्वीच दक्षिणेकडे प्रयाण करतात व अन्नाच्या तुटवड्यापासून स्वत:चे व पिलांचे संरक्षण करत असतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे-
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.

‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.

वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
वाक्य पूर्ण करा.
आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
कारणे लिहा.
लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण....
झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
जोड्या जुळवा.
| शिक्षक | गुणवैशिष्ट्य |
| (१) श्री. नाईक | (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ |
| (२) श्री. देशमुख | (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ |
| (३) श्री. गोळीवडेकर | (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय |
| (४) श्री. कात्रे | (ई) शेतीतज्ज्ञ |
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
