हिंदी

‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

पाणी हेच जीवन

'पृथ्वीवरती तीनच रत्ने-जल, अन्न व सुभाषितं' असे म्हटले जाते. पृथ्वीवर जीवसृष्टी तयार झाली ती पाण्यामुळेच. पाणी नसते तर माणूस, पशू, पक्षी, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांपैकी कोणीच जगले नसते. पृथ्वीचा ७१% भाग पाण्याने व्यापलेला असला तरी त्यांपैकी पाण्याचा बराचसा भाग समुद्र व महासागरात सामावलेला आहे. उरलेल्या २.५% पाण्यापैकी फक्त १% पाणीच पिण्यासाठी उपलब्ध आहे. हे पाणी म्हणजे आपल्यासाठी जीवनच आहे. ते जपून वापरावे लागेल. जोवर पाणी आहे, तोवरच पृथ्वीवरील सर्व जीव जिवंत राहतील.

आपल्या शरीरातही 60% ते 70% पाणी आहे. आवश्यक तेवढे पाणी पिण्यामुळेच आपण निरोगी राहू शकतो. तसेच पाणी नसेल, तर झाडे जगणार नाहीत. झाडे नसतील, तर आपल्याला अन्न-पाणी कोठून मिळणार? अन्नपाण्यावाचून माणसं, पशू, पक्षी सर्वच उपासमारीने नष्ट होतील. त्यामुळे, पाण्याचा जपून वापर करायला हवा, कारण पाणी आहे तर जीवसृष्टी आहे, पृथ्वीवर 'जीवन' आहे.

shaalaa.com
लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 17: पाणपोई - विचार करून सांगा! [पृष्ठ ५३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 17 पाणपोई
विचार करून सांगा! | Q ५. | पृष्ठ ५३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 18 आपण हे करूया !
विचार करून सांगा! | Q ५. | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्न

तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.


‘तुम्ही पक्षी आहात’, अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.


नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

 


मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.


'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.

१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...


तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.


खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-’) घाला व उतारा पुन्हा लिहा.

एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या तसेच दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे ते दूध तो साऱ्या गावात विकत असे.

एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. अगदी कासावीस झाला तो पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लाेक मुद्दाम गाईचे दूध तूप दही नेत असत आता लाेकांना काय सांगणार काय करावे शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला बाजार गुरांनी भरून गेला होता निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला अन काय आश्चर्य कपिलेने त्याच्याकडे पाहिले त्याचे ही डोळे चमकले अरे ही तर आपली गाय कपिला नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली कपिलेने त्याला ओळखले तिने आनंदाने कान व शिंगे हालवली.


खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.

एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला ____________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________


‘शब्द’ या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×