Advertisements
Advertisements
प्रश्न
‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
Advertisements
उत्तर
पाणी हेच जीवन
'पृथ्वीवरती तीनच रत्ने-जल, अन्न व सुभाषितं' असे म्हटले जाते. पृथ्वीवर जीवसृष्टी तयार झाली ती पाण्यामुळेच. पाणी नसते तर माणूस, पशू, पक्षी, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांपैकी कोणीच जगले नसते. पृथ्वीचा ७१% भाग पाण्याने व्यापलेला असला तरी त्यांपैकी पाण्याचा बराचसा भाग समुद्र व महासागरात सामावलेला आहे. उरलेल्या २.५% पाण्यापैकी फक्त १% पाणीच पिण्यासाठी उपलब्ध आहे. हे पाणी म्हणजे आपल्यासाठी जीवनच आहे. ते जपून वापरावे लागेल. जोवर पाणी आहे, तोवरच पृथ्वीवरील सर्व जीव जिवंत राहतील.
आपल्या शरीरातही 60% ते 70% पाणी आहे. आवश्यक तेवढे पाणी पिण्यामुळेच आपण निरोगी राहू शकतो. तसेच पाणी नसेल, तर झाडे जगणार नाहीत. झाडे नसतील, तर आपल्याला अन्न-पाणी कोठून मिळणार? अन्नपाण्यावाचून माणसं, पशू, पक्षी सर्वच उपासमारीने नष्ट होतील. त्यामुळे, पाण्याचा जपून वापर करायला हवा, कारण पाणी आहे तर जीवसृष्टी आहे, पृथ्वीवर 'जीवन' आहे.
संबंधित प्रश्न
तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?
रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

खालील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा.


शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल?

मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात, या विषयावर मित्रांशी चर्चा करा.
‘शब्द’ या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.
महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा.
