Advertisements
Advertisements
| संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वत:साठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे. |
वरील उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
निरर्थक ×
Concept: undefined >> undefined
Advertisements
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
अवरोह ×
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
अनिवार्य ×
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
दुमत ×
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
सुबोध ×
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
सूर्योदय ×
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
मालक ×
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
तिमिर ×
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
दुष्कर्म ×
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
संक्षिप्त ×
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
कृपा ×
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा:
लहान
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा:
ज्ञान
Concept: undefined >> undefined
खालील उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
| अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे काय कारण आहे? संकटे ही काही कायमची नसतात ना? मग त्यांच्याकडे सोशिकपणे, खिलाडू वृत्तीने पाहण्याची दृष्टी का असू नये? संकटांचे जेव्हा आपल्यावर आक्रमण होते, तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात; परंतु ती ओसरल्यावर, आपण त्यांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही. आपण घाबरतो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. मनाची शांती नसते याचे कारण अडचणींचे खरेखुरे स्वरूप आपणांस कळलेले नसते. जीवन म्हणजे संकटे नव्हेत, कारण ती असतानाही जीवन चालूच असते. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा-विनोद करतात, तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. |
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
सावध ×
Concept: undefined >> undefined
खालील उतारा वाचा व त्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
|
आनंदवनामध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले, राहण्यासाठी झोपडया बांधणे, अन्नधान्यासाठी शेती करणे यापासून अनेक पूरक उद्योग त्यांनी सुरू केले. अर्थात् ही प्रक्रिया सोपी नव्हती अनेक अडचणी होत्या. पण त्यावर मात करत बाबांनी भंगलेल्या शरीरांना, खचलेल्या मनांना जगण्याची उभारी दिली. ताठ मनाने जगण्याची प्रेरणा दिली. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोग्यांवर उपचार केले, त्यांना निवास उपलब्ध करून दिला. शिवाय त्वांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी साधने उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांना कष्टाची भाकरी मिळवता आली. त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यामुळे दैवाने मोडतोड केलेल्या चेहऱ्यांवर हास्य उमलले. हे हास्य समाधानाचे, आत्मविश्वासाचे होते. बोटं झडलेल्या थिट्या हातांना कामाची सवय लागावी आणि स्वाभिमानाचा ताठ कणा लाभावा यासाठी ‘आनंदवनाची’ धडपड असते. आनंदवन उभारताना बाबांनी आतोनात कष्ट घेतले त्यामुळेच गेली सहा दशके तिथे महारोगाने, अंधत्वाने, अपंगत्वाने झाकोळून गेलेली जीवने उजळून निघाली. जन्माला येतानाच उपेक्षा घेऊन आलेल्या जिवामध्ये ‘सुंदर मी होणार’ यासोबत ‘सुंदर मी करणार’ हा मंत्र आनंदवनने जोपासला. |
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
गरिबी ×
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
प्रगती ×
Concept: undefined >> undefined
खालील उतारा वाचा व त्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
| वनस्पतींमध्ये अखंड चोवीस तास पाणीपुरवठा होत असतो. घरातल्या नळाला जसं पाईपलाईनने पाणी पुरवलं जातं. तसं वनस्पतींमध्येही अनेक छोटे पाईप (झायलेम) एकमेकांवर बसवलेले असतात. त्यामुळे मुळांमध्ये जमिनीतून शोषलेलं पाणी या लांबलचक तयार झालेल्या पाईपद्वारे झाडांच्या शेंड्यापर्यंतही पुरवलं जातं. वनस्पतींमधलं स्वयंपाकघर म्हणजे हिरवी पानं! हरितद्रव्याच्या साहाय्यानं, सूर्यप्रकाशाच्या मदतीने पानं अन्न तयार करतात. ते विशिष्ट प्रकारच्या पेशींमधून (फ्लोएम) झाडाच्या इतर भागांपर्यंत पोहोचवलं जातं, त्या-त्या भागात अन्नावर प्रक्रियाही होते. याशिवाय गरजेनुसार या पेशींशिवाय अनेक पेशी असतात. त्यांची कामंही निरनिराळी असतात. काही वनस्पती पाण्यात राहूनही भिजत नाही; कारण त्यांच्या पेशींवर मेणाचा थर असतो. काही पाण्यात तरंगतात, कारण त्यांच्यात हवेच्या पिशव्या असतात. अशा अनेक विविध प्रकारच्या पेशी वेगवेगळ्या झाडात त्यांच्या गरजेनुसार आणि झाडांच्या गुणधर्मानुसार असतात. |
Concept: undefined >> undefined
